शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

विजय गायकवाड , नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विजय गायकवाड , वैजापूर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा घालून वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही तालुक्यांतील लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा फटका तालुक्यातील जवळपास ३० गावांना बसणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातून नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी २५ एप्रिल रोजी उन्हाळी आवर्तन सोडले होते. २८ एप्रिलला आवर्तन वैजापूर तालुक्यात पोहोचले. गंगापूर तालुक्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. नांमकाच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ६० व गंगापूर तालुक्यातील ४० गावे येतात. गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यानंतर वैजापूर तालुक्यात पाणी सोडण्याचे नियोजन नांमका विभागाने केले होते. तालुक्यातील जवळपास ३० गावांना पाणी पोहोचले होते; परंतु नाशिक पाटबंधारे विभागाने शुक्रवारी पाणी अचानक बंद केले. नाशिक पाटबंधारे विभागाच्या या तुघलकी कारभारामुळे तालुक्यात पाणीवाटपाचे नियोजन कोलमडल्याचे नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले. या आवर्तनातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना एक हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवस पाणी सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातील प्रकल्पांचे पाणी नाशिक जिल्ह्याला पिण्यास पुरवण्यासाठी सुधारित देय कोट्यानुसार कालव्यासाठी केवळ ५०५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असल्याचा संदेश पाच मे रोजी नांमका विभागाला पाठवला व चार दिवसांनी पाणी बंद केले. पाण्यावरून आता नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. १०५४ दशलक्ष घनफूट पाणी पळविले मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या मुखाशी एकूण ४ हजार ३१८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत नांमकाद्वारे सोडलेल्या आवर्तनातून २५९० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. तिसर्‍या आवर्तनातून १७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवसांतच आवर्तन अचानक बंद करण्यात आले. तिसर्‍या आवर्तनात फक्त ६७४ दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. म्हणजेच या आवर्तनाचे १०५४ दशलक्ष घनफूट पाणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पळविले.