शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

विजय गायकवाड , नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विजय गायकवाड , वैजापूर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा घालून वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही तालुक्यांतील लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा फटका तालुक्यातील जवळपास ३० गावांना बसणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातून नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी २५ एप्रिल रोजी उन्हाळी आवर्तन सोडले होते. २८ एप्रिलला आवर्तन वैजापूर तालुक्यात पोहोचले. गंगापूर तालुक्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. नांमकाच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ६० व गंगापूर तालुक्यातील ४० गावे येतात. गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यानंतर वैजापूर तालुक्यात पाणी सोडण्याचे नियोजन नांमका विभागाने केले होते. तालुक्यातील जवळपास ३० गावांना पाणी पोहोचले होते; परंतु नाशिक पाटबंधारे विभागाने शुक्रवारी पाणी अचानक बंद केले. नाशिक पाटबंधारे विभागाच्या या तुघलकी कारभारामुळे तालुक्यात पाणीवाटपाचे नियोजन कोलमडल्याचे नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले. या आवर्तनातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना एक हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवस पाणी सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातील प्रकल्पांचे पाणी नाशिक जिल्ह्याला पिण्यास पुरवण्यासाठी सुधारित देय कोट्यानुसार कालव्यासाठी केवळ ५०५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असल्याचा संदेश पाच मे रोजी नांमका विभागाला पाठवला व चार दिवसांनी पाणी बंद केले. पाण्यावरून आता नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. १०५४ दशलक्ष घनफूट पाणी पळविले मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या मुखाशी एकूण ४ हजार ३१८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत नांमकाद्वारे सोडलेल्या आवर्तनातून २५९० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. तिसर्‍या आवर्तनातून १७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवसांतच आवर्तन अचानक बंद करण्यात आले. तिसर्‍या आवर्तनात फक्त ६७४ दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. म्हणजेच या आवर्तनाचे १०५४ दशलक्ष घनफूट पाणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पळविले.