शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

विजय गायकवाड , नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विजय गायकवाड , वैजापूर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा घालून वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही तालुक्यांतील लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा फटका तालुक्यातील जवळपास ३० गावांना बसणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातून नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी २५ एप्रिल रोजी उन्हाळी आवर्तन सोडले होते. २८ एप्रिलला आवर्तन वैजापूर तालुक्यात पोहोचले. गंगापूर तालुक्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. नांमकाच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ६० व गंगापूर तालुक्यातील ४० गावे येतात. गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यानंतर वैजापूर तालुक्यात पाणी सोडण्याचे नियोजन नांमका विभागाने केले होते. तालुक्यातील जवळपास ३० गावांना पाणी पोहोचले होते; परंतु नाशिक पाटबंधारे विभागाने शुक्रवारी पाणी अचानक बंद केले. नाशिक पाटबंधारे विभागाच्या या तुघलकी कारभारामुळे तालुक्यात पाणीवाटपाचे नियोजन कोलमडल्याचे नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले. या आवर्तनातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना एक हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवस पाणी सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातील प्रकल्पांचे पाणी नाशिक जिल्ह्याला पिण्यास पुरवण्यासाठी सुधारित देय कोट्यानुसार कालव्यासाठी केवळ ५०५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असल्याचा संदेश पाच मे रोजी नांमका विभागाला पाठवला व चार दिवसांनी पाणी बंद केले. पाण्यावरून आता नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. १०५४ दशलक्ष घनफूट पाणी पळविले मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या मुखाशी एकूण ४ हजार ३१८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत नांमकाद्वारे सोडलेल्या आवर्तनातून २५९० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. तिसर्‍या आवर्तनातून १७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवसांतच आवर्तन अचानक बंद करण्यात आले. तिसर्‍या आवर्तनात फक्त ६७४ दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. म्हणजेच या आवर्तनाचे १०५४ दशलक्ष घनफूट पाणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पळविले.