शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

विजय गायकवाड , नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विजय गायकवाड , वैजापूर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा घालून वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही तालुक्यांतील लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा फटका तालुक्यातील जवळपास ३० गावांना बसणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातून नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी २५ एप्रिल रोजी उन्हाळी आवर्तन सोडले होते. २८ एप्रिलला आवर्तन वैजापूर तालुक्यात पोहोचले. गंगापूर तालुक्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. नांमकाच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ६० व गंगापूर तालुक्यातील ४० गावे येतात. गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यानंतर वैजापूर तालुक्यात पाणी सोडण्याचे नियोजन नांमका विभागाने केले होते. तालुक्यातील जवळपास ३० गावांना पाणी पोहोचले होते; परंतु नाशिक पाटबंधारे विभागाने शुक्रवारी पाणी अचानक बंद केले. नाशिक पाटबंधारे विभागाच्या या तुघलकी कारभारामुळे तालुक्यात पाणीवाटपाचे नियोजन कोलमडल्याचे नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले. या आवर्तनातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना एक हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवस पाणी सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातील प्रकल्पांचे पाणी नाशिक जिल्ह्याला पिण्यास पुरवण्यासाठी सुधारित देय कोट्यानुसार कालव्यासाठी केवळ ५०५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असल्याचा संदेश पाच मे रोजी नांमका विभागाला पाठवला व चार दिवसांनी पाणी बंद केले. पाण्यावरून आता नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. १०५४ दशलक्ष घनफूट पाणी पळविले मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या मुखाशी एकूण ४ हजार ३१८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत नांमकाद्वारे सोडलेल्या आवर्तनातून २५९० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. तिसर्‍या आवर्तनातून १७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवसांतच आवर्तन अचानक बंद करण्यात आले. तिसर्‍या आवर्तनात फक्त ६७४ दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. म्हणजेच या आवर्तनाचे १०५४ दशलक्ष घनफूट पाणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पळविले.