शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकरी हिताच्या आडवं आल्यास तुडवू : राजू शेट्टी

By admin | Updated: May 28, 2017 01:15 IST

सरकारला निर्वाणीचा इशारा : मोदींनी फेकूगिरी बंद करावी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने कर्जमुक्तीची मागणी आम्ही करीत आहोत. आम्ही भीक मागत नसून घामाचे दाम मागतो. शेतकरी हिताच्या जो कोणी आडवं येईल, त्याला तुडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेकूगिरी बंद करून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करावा, असेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’च्या ‘आत्मक्लेश’ यात्रा सहाव्या दिवशी, शनिवारी पनवेल येथे पोहोचली. त्यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला. नरेंद्र मोदी यांनी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले; पण त्यांना शेतीतील काहीच कळत नाही. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे पालन केले असते, तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सरकारने सुरू केले असून, मोदींनी आता फेकूगिरी बंद करावी. आमच्यावर कोणी दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. अन्यथा, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, राजेंद्र गड्याण्णावर, माणिक कदम, देवेंद्र भुयार, विकास देशमुख, रसिका ढगे, राजेंद्र ढवाण, सुरेश गवळी, प्रल्हाद इंगोले, दामू इंगोले, सचिन नलवडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप खासदार-आमदारांवर टीकाभाजपने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची भाजप आमदार-खासदारांची लायकी नसल्याचे टीकास्त्र शेट्टी यांनी सोडले.पाय सुजले, रक्तदाबही कमीपुण्यावरून सुरू केलेली, ‘आत्मक्लेश यात्रा’ १४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून, शनिवारी पनवेलमध्ये दाखल झाली. यावेळी सलग सहा दिवस पायी चालल्याने खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचे पाय सुजले आहेत, तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे.सरपटत जाईन, पण राजभवन गाठणारच!राजू शेट्टी यांचा रक्तदाब वाढला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पायाला जखमा झाल्याने त्यांना नीट चालताही येत नाही. सरपटत जाईन, पण मंगळवारी राजभवन गाठणारच, असा निर्धार शेट्टी यांनी यावेळी केला.