शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

शेतकरी हिताच्या आडवं आल्यास तुडवू : राजू शेट्टी

By admin | Updated: May 28, 2017 01:15 IST

सरकारला निर्वाणीचा इशारा : मोदींनी फेकूगिरी बंद करावी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने कर्जमुक्तीची मागणी आम्ही करीत आहोत. आम्ही भीक मागत नसून घामाचे दाम मागतो. शेतकरी हिताच्या जो कोणी आडवं येईल, त्याला तुडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेकूगिरी बंद करून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करावा, असेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’च्या ‘आत्मक्लेश’ यात्रा सहाव्या दिवशी, शनिवारी पनवेल येथे पोहोचली. त्यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला. नरेंद्र मोदी यांनी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले; पण त्यांना शेतीतील काहीच कळत नाही. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे पालन केले असते, तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सरकारने सुरू केले असून, मोदींनी आता फेकूगिरी बंद करावी. आमच्यावर कोणी दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. अन्यथा, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, राजेंद्र गड्याण्णावर, माणिक कदम, देवेंद्र भुयार, विकास देशमुख, रसिका ढगे, राजेंद्र ढवाण, सुरेश गवळी, प्रल्हाद इंगोले, दामू इंगोले, सचिन नलवडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप खासदार-आमदारांवर टीकाभाजपने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची भाजप आमदार-खासदारांची लायकी नसल्याचे टीकास्त्र शेट्टी यांनी सोडले.पाय सुजले, रक्तदाबही कमीपुण्यावरून सुरू केलेली, ‘आत्मक्लेश यात्रा’ १४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून, शनिवारी पनवेलमध्ये दाखल झाली. यावेळी सलग सहा दिवस पायी चालल्याने खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचे पाय सुजले आहेत, तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे.सरपटत जाईन, पण राजभवन गाठणारच!राजू शेट्टी यांचा रक्तदाब वाढला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पायाला जखमा झाल्याने त्यांना नीट चालताही येत नाही. सरपटत जाईन, पण मंगळवारी राजभवन गाठणारच, असा निर्धार शेट्टी यांनी यावेळी केला.