शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शेतकरी हिताच्या आडवं आल्यास तुडवू : राजू शेट्टी

By admin | Updated: May 28, 2017 01:15 IST

सरकारला निर्वाणीचा इशारा : मोदींनी फेकूगिरी बंद करावी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने कर्जमुक्तीची मागणी आम्ही करीत आहोत. आम्ही भीक मागत नसून घामाचे दाम मागतो. शेतकरी हिताच्या जो कोणी आडवं येईल, त्याला तुडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेकूगिरी बंद करून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करावा, असेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’च्या ‘आत्मक्लेश’ यात्रा सहाव्या दिवशी, शनिवारी पनवेल येथे पोहोचली. त्यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला. नरेंद्र मोदी यांनी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले; पण त्यांना शेतीतील काहीच कळत नाही. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे पालन केले असते, तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सरकारने सुरू केले असून, मोदींनी आता फेकूगिरी बंद करावी. आमच्यावर कोणी दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. अन्यथा, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, राजेंद्र गड्याण्णावर, माणिक कदम, देवेंद्र भुयार, विकास देशमुख, रसिका ढगे, राजेंद्र ढवाण, सुरेश गवळी, प्रल्हाद इंगोले, दामू इंगोले, सचिन नलवडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप खासदार-आमदारांवर टीकाभाजपने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची भाजप आमदार-खासदारांची लायकी नसल्याचे टीकास्त्र शेट्टी यांनी सोडले.पाय सुजले, रक्तदाबही कमीपुण्यावरून सुरू केलेली, ‘आत्मक्लेश यात्रा’ १४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून, शनिवारी पनवेलमध्ये दाखल झाली. यावेळी सलग सहा दिवस पायी चालल्याने खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचे पाय सुजले आहेत, तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे.सरपटत जाईन, पण राजभवन गाठणारच!राजू शेट्टी यांचा रक्तदाब वाढला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पायाला जखमा झाल्याने त्यांना नीट चालताही येत नाही. सरपटत जाईन, पण मंगळवारी राजभवन गाठणारच, असा निर्धार शेट्टी यांनी यावेळी केला.