शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात बांगलादेशीयाकडून राजरोस वेश्या व्यवसाय

By admin | Updated: August 27, 2016 21:31 IST

वेश्या व्यवसाय केवळ उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातच फोफावलाय असे नव्हे तर अगदी मडगावातही हा व्यवसाय राजरोस चालू आहे

- ऑनलाइन लोकमत
मडगाव, दि. 27 -  वेश्या व्यवसाय केवळ उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातच फोफावलाय असे नव्हे तर अगदी मडगावातही हा व्यवसाय राजरोस चालू आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे बांगलादेशी नागरिकाकडून हा वेश्या अड्डा चालू होता. फरार असलेल्या या बांगलादेशातील व्यावसायिकांना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरलेत. 
 
काही दिवसांपूर्वी मेरशी येथील महिला सुधारगृहातून पळून गेलेल्या बांगलादेशी युवतींच्या प्रकरणातून आता ही गोष्ट उजेडात आली आहे. एकूण नऊ युवतींबरोबर बांगलादेशातीलही काही युवती पळून गेल्या होत्या. त्यापैकी दोन मडगावातून या व्यवसायातून मुक्त केलेल्या होत्या. त्यापैकी एक युवती सापडली दुसरीचा ठाव लागलेला नाही.
 
मिळालेल्या माहितीप्रमाणो, रिझाऊल अली या बांगलादेशी एजंटने या दोन्ही युवतींना मडगावात आणले होते. दवर्ली येथे राहाणा:या इम्रान या व्यक्तीच्या साहाय्याने मडगावात हा वेश्या अड्डा चालविला जात होता. इम्रानला मरियम व झोया या दोन महिलाही साहाय्य करायच्या. या दोन्ही महिला बांगलादेशी असून इम्रानने त्यांच्याशी लग्न केले होते. इम्रानने दवर्ली-हाउसिंग बोर्डमध्ये दोन घरे भाडय़ाने घेतली होती. त्या दोन्ही घरांत त्याने मरियम व झोयाला ठेवले होते. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या युवतींना इम्रान याच आपल्या पत्नींकडे ठेवायचा, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. मरियमच्याच माध्यमातून रिझाऊलने बांगलादेशाच्या त्या दोन युवतींना मडगावात आणले, अशी माहिती प्राप्त झाली आहे. बांगलादेशी इसमाकडून मडगावात हा वेश्या व्यवसाय कित्येक महिने चालू होता. मात्र, या युवती पोलिसांच्या हाती सापडल्यानंतर या सर्व आरोपींनी मडगावातून पळ काढला.
 
पोलिसांनी ज्या दोन बांगलादेशी युवतींची मुक्तता केली होती त्या युवतींना बांगलादेशातील बोराशोर या जिल्हय़ातून गोव्यात आणले होते. इम्रानने त्यापैकी एका युवतीला मरियमकडे तर दुस:या युवतीला झोयाकडे ठेवले होते. वास्तविक गि:हाईक हेरून वेश्या व्यवसायातील युवतीला त्या गि:हाईकाकडे नेऊन सोडणो ही वेश्या व्यवसायातील नेहमीची पद्धत असते. मात्र, येथे हा अड्डा चालविणा:या इम्रानचा कोणाला संशय येऊ नये यासाठी गि:हाईकाचा दूरध्वनी क्रमांक या व्यवसायात गुंतविलेल्या युवतींना देऊन त्यांनाच एकटय़ाने गि:हाईकाकडे पाठवीत. त्यासाठी माडेल-मडगाव येथील एक फ्लॅट घेतला होता. 
 
पोलिसांना या व्यवसायाची कुणकुण लागल्यानंतर पाठविलेल्या एका तोतया गि:हाईकाच्या माध्यमातून पोलिसांना या रॅकेटचा पत्ता लागला होता. त्यापैकी एका युवतीला कोलवा येथे तर दुस:या युवतीला मडगाव बसस्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस इम्रानच्या दवर्लीतील त्या घरी गेले असता, त्यांना आणखी एक मुलगी सापडली होती. जिला घरकामासाठी म्हणून बांगलादेशातून आणून प्रत्यक्षात वेश्या व्यवसायास जुंपले होते.
 
यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी मडगावचे पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्याने तो होवू शकला नाही.  
 
 
लग्नाच्या आमिषाने गोव्यात
मडगाव पोलिसांनी या व्यवसायातून ज्या दोन युवतींची सुटका केली, त्यापैकी एका युवतीशी आरोपी रिझाऊल अली याने बांगलादेशात लग्न केले होते. वास्तविक त्या युवतीचे त्यापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, तिचे पतीशी पटत नव्हते. याचाच फायदा रिझाऊलने उठवून तिच्याशी लग्नाचा बहाणा केला आणि तिला मडगावात आणले. मडगावात आल्यावर आपल्याकडचे पैसे संपले आहेत असे सांगून रिझाऊलने तिला मरियमच्या ताब्यात दिले. त्या दिवसापासून तिला वेश्या व्यवसायात जुंपले. हीच युवती नंतर मेरशीच्या सुधारगृहातून पळाली, जिचा पत्ता लागलेला नाही. याच मरियमने दुस:या युवतीलाही रिझवानच्याच माध्यमातून मडगावात आणले. रिझवानने यासाठी बांगलादेशातील  दुस:या एका भावाचा आधार घेतला. या भावानेही त्या युवतीशी प्रेमसंबंध जोडून तिला रेल्वेत बसवून गोव्यात पाठवून दिले. ती युवती आयतीच या वेश्या व्यवसायातील दलालाच्या हाती सापडली. या युवतीनेही सुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला बंगाली भाषा सोडून अन्य कोणतीही भाषा समजत नसल्याने ती पुन्हा या सुधारगृहात आली, अशी माहिती अर्ज या संघटनेचे अरुण पांडे यांच्याकडून प्राप्त झाली.
 
केवळ आठ हजारांत बॉर्डर पार
बांगलादेशातून भारतात ज्या युवतींची तस्करी केली जाते ती एक तर नोकरीचे किंवा लग्नाचे आमिष दाखवून. ज्या दोन युवतींना अशाचप्रकारे बांगलादेशातून कोलकात्यात आणले गेले त्यासाठी एजंटला आठ हजार रुपये दिल्याची माहिती मिळाली. केवळ आठ हजारांत अशाप्रकारे बॉर्डर पार केली जाते. अशा सहजपणो जर युवतींची भारतात तस्करी केली जाते तर त्याच मार्गाने अतिरेकीही येऊ शकतात, अशी भीती काही अधिका:यांनी व्यक्त केली.