शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

राजेगाव परिसर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 28, 2016 01:29 IST

जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

राजेगाव : जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे राजेगाव परिसरातील शेतकरीवर्ग आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ऐन उन्हाळ्यात भामा-आसखेड धरणातून दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी सोडलेले पाणी येथपर्यंत पोहोचले नसल्याने या परिसरात नदीचे विदारक चित्र दिसत आहे. पुणे परिसरातील धरण साखळीत दमदार पाऊस झाला तरच भीमा नदीला पाणी येऊन धरणात पाणी वाढेल, अशा प्रकारचा आशावाद परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. यापूर्र्वी भीमा नदीला कधी नव्हते इतके विदारक रूप आले आहे. उजनी धरण झाल्यानंतर गेल्या ४0 वर्षांत कधीही न आटलेली भीमा नदी राजेगाव परिसरात पहिल्यांदाच आटली आहे. वाळूउपसा, निसर्गाचा असमतोल आदींमुळे एकेकाळी सौंदर्याचे प्रतीक असलेली भीमा नदी भकास दिसू लागली आहे. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने या वर्षी दुष्काळाची झळ सर्वच व्यवसायांना बसली. तरीही भीमा नदीच्या सौंदर्याची काळजी घेण्याऐवजी अनेकांकडून नदीचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वरुणराजाची चातकासारखी वाट पाहत आहेत. उजनी धरण हे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यांतील शेतकऱ्यांना वरदानच ठरले आहे. या धरणांतील बॅकवॉटरच्या पाण्यावर या भागातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. मुबलक प्रमाणात मिळत असलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी ऊस हे प्रमुख पीक घेत आलेला आहे. त्यामुळे या परिसरात अनेक साखर कारखाने उभे राहिले आहेत. असे असले तरी दुष्काळाशी दोन हात करत शेतकरी आपल्या जमिनींची मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. (वार्ताहर)>चिंता वाढली : मशागतींना वेग