शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राजेगाव परिसर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 28, 2016 01:29 IST

जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

राजेगाव : जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे राजेगाव परिसरातील शेतकरीवर्ग आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ऐन उन्हाळ्यात भामा-आसखेड धरणातून दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी सोडलेले पाणी येथपर्यंत पोहोचले नसल्याने या परिसरात नदीचे विदारक चित्र दिसत आहे. पुणे परिसरातील धरण साखळीत दमदार पाऊस झाला तरच भीमा नदीला पाणी येऊन धरणात पाणी वाढेल, अशा प्रकारचा आशावाद परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. यापूर्र्वी भीमा नदीला कधी नव्हते इतके विदारक रूप आले आहे. उजनी धरण झाल्यानंतर गेल्या ४0 वर्षांत कधीही न आटलेली भीमा नदी राजेगाव परिसरात पहिल्यांदाच आटली आहे. वाळूउपसा, निसर्गाचा असमतोल आदींमुळे एकेकाळी सौंदर्याचे प्रतीक असलेली भीमा नदी भकास दिसू लागली आहे. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने या वर्षी दुष्काळाची झळ सर्वच व्यवसायांना बसली. तरीही भीमा नदीच्या सौंदर्याची काळजी घेण्याऐवजी अनेकांकडून नदीचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वरुणराजाची चातकासारखी वाट पाहत आहेत. उजनी धरण हे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यांतील शेतकऱ्यांना वरदानच ठरले आहे. या धरणांतील बॅकवॉटरच्या पाण्यावर या भागातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. मुबलक प्रमाणात मिळत असलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी ऊस हे प्रमुख पीक घेत आलेला आहे. त्यामुळे या परिसरात अनेक साखर कारखाने उभे राहिले आहेत. असे असले तरी दुष्काळाशी दोन हात करत शेतकरी आपल्या जमिनींची मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. (वार्ताहर)>चिंता वाढली : मशागतींना वेग