शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राजेगाव परिसर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 28, 2016 01:29 IST

जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

राजेगाव : जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे राजेगाव परिसरातील शेतकरीवर्ग आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ऐन उन्हाळ्यात भामा-आसखेड धरणातून दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी सोडलेले पाणी येथपर्यंत पोहोचले नसल्याने या परिसरात नदीचे विदारक चित्र दिसत आहे. पुणे परिसरातील धरण साखळीत दमदार पाऊस झाला तरच भीमा नदीला पाणी येऊन धरणात पाणी वाढेल, अशा प्रकारचा आशावाद परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. यापूर्र्वी भीमा नदीला कधी नव्हते इतके विदारक रूप आले आहे. उजनी धरण झाल्यानंतर गेल्या ४0 वर्षांत कधीही न आटलेली भीमा नदी राजेगाव परिसरात पहिल्यांदाच आटली आहे. वाळूउपसा, निसर्गाचा असमतोल आदींमुळे एकेकाळी सौंदर्याचे प्रतीक असलेली भीमा नदी भकास दिसू लागली आहे. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने या वर्षी दुष्काळाची झळ सर्वच व्यवसायांना बसली. तरीही भीमा नदीच्या सौंदर्याची काळजी घेण्याऐवजी अनेकांकडून नदीचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वरुणराजाची चातकासारखी वाट पाहत आहेत. उजनी धरण हे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यांतील शेतकऱ्यांना वरदानच ठरले आहे. या धरणांतील बॅकवॉटरच्या पाण्यावर या भागातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. मुबलक प्रमाणात मिळत असलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी ऊस हे प्रमुख पीक घेत आलेला आहे. त्यामुळे या परिसरात अनेक साखर कारखाने उभे राहिले आहेत. असे असले तरी दुष्काळाशी दोन हात करत शेतकरी आपल्या जमिनींची मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. (वार्ताहर)>चिंता वाढली : मशागतींना वेग