शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

मतदारांनी आणले राज ठाकरेंना जमिनीवर

By admin | Updated: May 17, 2014 04:45 IST

हिंदी सिनेमाचे एक गाजलेले गाणे आहे. त्या गाण्यासारखी अवस्था आज मनसेची आणि राज ठाकरे यांची झाली आहे. ‘बंद थी मुठ्ठी लाख की.... अब खुल गयी तो हुयी खाक की...’

हिंदी सिनेमाचे एक गाजलेले गाणे आहे. त्या गाण्यासारखी अवस्था आज मनसेची आणि राज ठाकरे यांची झाली आहे. ‘बंद थी मुठ्ठी लाख की.... अब खुल गयी तो हुयी खाक की...’ या अवस्थेला आपण का आलो याचे उत्तर देण्यासाठी मनसेचा एकही नेता आज पुढे आला नाही. आपले उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना पाठिंबा देतील, असे सांगत शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्याच्या रणनीतीपासून ते ‘माझी औकात काढता काय... आता मी माझी औकातच दाखवून देतो़ बाळासाहेब आजारी असताना मी सूप नेऊन देत होतो.’ अशी विधाने करेपर्यंत सतत ठरवून, मोजूनमापून प्रत्येक गोष्ट करणार्‍या राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी केलेली खेळी आणि विधाने अखेर त्यांच्याच अंगाशी आली. आपण लोकसभेसाठी उमेदवार उभे करायचे की नाही हे अजूनही ठरवलेले नाही, असे सांगत असतानाच अचानक राज ठाकरे यांनी नऊ जागी उमेदवार उभे केले. मोदींना पाठिंबा जाहीर करून त्यांनी अतिशय धूर्त राजकीय खेळी खेळली, मात्र त्यातल्या सात जागी त्यांनी शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार दिले आणि केवळ दोन ठिकाणी भाजपाच्या विरोधात उमेदवार दिले. मोदींना पाठिंबा देण्याची धूर्त चाल पुढे मात्र त्यांना खेळता आली नाही. पुढे त्यांनी औकातीचा विषय काढला़ त्या भाषेने त्यांच्यावर प्रेम करणारे खट्टू झाले़ मात्र त्याही पुढे जाऊन त्यांनी बाळासाहेबांना कसलातरी तेलकट वडा खायला दिला जात होता, म्हणून मी सूप नेऊन देत होतो असे सांगून अनेकांची टोकाची नाराजी ओढवून घेतली. या दोन गोष्टी घडेपर्यंत राजच्या पक्षाने निवडणुका लढवूच नयेत का, अशी त्यांची वकिली करणारे देखील नंतरच्या या दोन विधानांमुळे दुखावले गेले. मोजूनमापून वागणार्‍या राज यांच्याकडून ही अपेक्षा न करणार्‍यांच्या जिव्हारी या गोष्टी लागल्या. त्या उलट उद्धव ठाकरे यांनी मात्र या विषयावर आपल्याला काहीही बोलायचे नाही, अशी संयमी भूमिका घेतल्याने तर राज यांची आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली. मनसे म्हणजे काँग्रेसने टाकलेला सापळा आहे, असे उद्धव ठाकरेंचे विधानदेखील राज यांना खोडता आले नाही. त्यात राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरेंचे कौतुक आणि उद्धव यांच्यावर टीका करीत या सापळ्यात राज यांना पुरते अडकवून टाकले. २००९ साली लोकसभेसाठी १२ उमेदवार उभे करीत मनसेने मराठी मतांचे विभाजन करीत काँग्रेस राष्टÑवादीचे ११ उमेदवार निवडून आणण्यात मदत केल्याची आकडेवारी समोर होती. राज यांच्याकडे नवा कोणताही मुद्दा नव्हता. या सार्‍यांचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि त्यांची २००९ साली १५ लाख मतं मिळविणारी मनसे यावेळी ९ उमेदवार उभे करून देखील अवघ्या १.५ टक्के म्हणजे ६ लाख ९८ हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे. शिवाय सगळ्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले ते वेगळेच. लोकसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही़ आपले मनसैनिक मोदींच्या पाठीशी उभे राहतील असे जर राज यांनी घोषित केले असते, तर या निकालानंतर ते हीरो ठरले असते; मात्र उमेदवार उभे करून ते झीरो ठरले.