शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

राज यांना आता आर्थिक निकष का आठवला?

By admin | Updated: October 4, 2016 05:09 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका सातत्याने मांडली, पण त्यांनी इतरांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका सातत्याने मांडली, पण त्यांनी इतरांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. मात्र, शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या व्यंगचित्राबद्दल एक शब्द न उच्चारणाऱ्या राज ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली की आर्थिक निकषाचा मुद्दा का आठवला, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.शिवसेनेच्या मुखपत्रातील आक्षेपार्ह व्यंगचित्राबद्दल खा. संजय राऊत यांनी आधीच माफी मागितली असती, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागण्याची वेळच आली नसती. पण कदाचित राऊत हे उद्धव यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असावेत, असा चिमटाही राणे यांनी काढला.राणे म्हणाले, आजच्या काळात आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका घेताना कोणाचेही एक टक्का तरी आरक्षण काढणे शक्य आहे का? ते कोणीही करून पाहावे, मग काय घडू शकते ते त्यांना कळेल. आम्ही सरकारमध्ये असताना तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात आरक्षणाची भूमिका मांडली होती. राज्यघटनेच्या कलम १५ (४) व कलम १६ (४)नुसार आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण ते कोर्टात टिकले नाही. कारण आम्ही १८ लाख लोकांशी संवाद साधून तयार केलेला अहवाल न्यायालयाने पाहिला नाही, असेही ते म्हणाले. व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली. माफी मागितली नाही, तर पक्ष टिकेल की नाही अशी त्यांना भीती होती. आरक्षणाबाबत कोर्टात कोणते मुद्दे मांडायचे याविषयी भाजपा-शिवसेनेचे एकमत होत नाही, असा आरोपही राणे यांनी केला.