शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

पाऊसफुल्ल दिवस

By admin | Updated: September 21, 2016 06:30 IST

मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मुंबईकरांची त्रेधा उडवली.

मुंबई- मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मुंबईकरांची त्रेधा उडवली. पावसामुळे शहरात ३ घरांची पडझड होऊन २ जण जखमी झाले. मुसळधार पावसात समोरचे काहीच दिसत नसल्याने लोकलचा वेग मंदावला. अनेक स्थानकांतील इंडिकेटर्स बंद अथवा चुकीची वेळ दाखवत होते. चाकरमान्यांची आॅफिसला जाताना आणि घरी परतताना चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईत वर्षाला सरासरी २३५ सेंटीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत कुलाब्यात २०९ सेंटीमीटर तर सांताक्रुझ येथे २५१ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा यंदा कुलाबा येथे १४.४ तर सांताक्रुझ येथे ३७.७ सेंटीमीटर अधिक पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली. संध्याकाळपर्यंत शहर परिसर ४०.३९ मिलीमीटर, पूर्व उपनगर ६५.१५ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात ८३.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने आजघडीला मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९९ टक्के भरले आहेत. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा अपेक्षित असताना, २० सप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवळ १० लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा होता. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. - आणखी वृत्त/२