शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दगा; २ लाख हेक्टवरील सोयाबीनला फटका !

By admin | Updated: August 23, 2016 17:20 IST

जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे.

शेतकरी चिंतातूर : शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने वटारले डोळेबाबूराव चव्हाण/ ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. २३ : जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे. प्रत्यक्षात २ लाख ८ हजार ९६६ हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी पेरणी झाली. जुलैअखेरपर्यंत झालेल्या सततच्या रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे सर्वच पिके जोमदार आली. परंतु, हे पिके ऐन वाढीच्या तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दोन लाख हेक्टवरील सोयाबीन अखेरच्या घटका मोजत आहे.

पाच वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्र वाढ होत आहे. खरीप हंगामाच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी चाळी ते बेचाळीस टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले आहे. यंदा जून महिन्यात वरूणराजाची चांगली कृपा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनीही चाढ्यावर मुठ धरण्यास विलंब केला नाही. परिणामी पेरणीच्या टक्केवारीने शंभरी (१०६ टक्के) ओलांडली. जुलै महिन्यातील पावसाची सरासरी १५१ मिमी असताना प्रत्यक्ष २०३ मिमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्वच पिकांची वाढ अपेक्षिापेक्षाही चांगली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. अनेक शेतकऱ्यांनी पिके पदरात पडणारच, असे गृहित धरून विमाही उतरविला नाही.

असे असतानाच आॅगस्ट महिन्यात पावसाने डोळे वटारले. आज-उद्या पाऊस पडेल, अशी अपेक्षा असतानाच वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लोटला. परंतु, पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे विशेष: सोयाबीन पिकाला जबर फटका बसला आहे. शेंगा भरण्याच्या तसेच वाढीच्या अवस्थेत असलेली सुमारे २ लाख ८ हजार हेक्टरवरील ही पिके अक्षरश: अखेरच्या घटका मोजत आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या भयान संकटातून मोठ्या हिम्मतीने कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याफार उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून तुषार सिंचन पद्धतीने पिके जगविण्यासाठीची कसरत सुरू केली आहे. परंतु, विद्युत भारनियमनामुळे हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत.

काय आहे पिकांची अवस्था?जिल्हाभरात ४७ हजार ८५० हेक्टवर उडीद आहे. हेही पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सुमारे २६ हजार हेक्टवर मुग आहे. शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. ९ हजार ८६० हेक्टवर बाजरीचे पीक आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पिकाखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ९७ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्ष १ लाख ११ हजार ७३८ हेक्टवर पेरणी झाली आहे. पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कापसाची लागवड १९ हजार ७५ हेक्टवर झाली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाखाली २२ हजार ९८ हेक्टवर क्षेत्र आहे. हे पीक सुद्धा वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तर हलक्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नाहीजिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ७६७.५ मिमी एवढे आहे. २२ आॅगस्टअखेर केवळ ३७४.१ मिमी म्हणजेच ४८.७ टक्के पाऊस झाला आहे. यापैकी जून महिन्यात १२७.४ मिमी, जुलै महिन्यात २०३.९ मिमी आणि आॅगस्ट महिन्यात (आजपर्यंत) ४२.८ मिमी म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या २० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात ४२ महसूल मंडळे आहेत. यापैकी १३ मंडळे अशी आहेत, की जेथे ३०० मिमी पेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. विशेषत: या भागातील पिके सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिके वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.----------------