शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पावसाचा दगा; २ लाख हेक्टवरील सोयाबीनला फटका !

By admin | Updated: August 23, 2016 17:20 IST

जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे.

शेतकरी चिंतातूर : शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने वटारले डोळेबाबूराव चव्हाण/ ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. २३ : जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे. प्रत्यक्षात २ लाख ८ हजार ९६६ हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी पेरणी झाली. जुलैअखेरपर्यंत झालेल्या सततच्या रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे सर्वच पिके जोमदार आली. परंतु, हे पिके ऐन वाढीच्या तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दोन लाख हेक्टवरील सोयाबीन अखेरच्या घटका मोजत आहे.

पाच वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्र वाढ होत आहे. खरीप हंगामाच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी चाळी ते बेचाळीस टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले आहे. यंदा जून महिन्यात वरूणराजाची चांगली कृपा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनीही चाढ्यावर मुठ धरण्यास विलंब केला नाही. परिणामी पेरणीच्या टक्केवारीने शंभरी (१०६ टक्के) ओलांडली. जुलै महिन्यातील पावसाची सरासरी १५१ मिमी असताना प्रत्यक्ष २०३ मिमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्वच पिकांची वाढ अपेक्षिापेक्षाही चांगली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. अनेक शेतकऱ्यांनी पिके पदरात पडणारच, असे गृहित धरून विमाही उतरविला नाही.

असे असतानाच आॅगस्ट महिन्यात पावसाने डोळे वटारले. आज-उद्या पाऊस पडेल, अशी अपेक्षा असतानाच वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लोटला. परंतु, पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे विशेष: सोयाबीन पिकाला जबर फटका बसला आहे. शेंगा भरण्याच्या तसेच वाढीच्या अवस्थेत असलेली सुमारे २ लाख ८ हजार हेक्टरवरील ही पिके अक्षरश: अखेरच्या घटका मोजत आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या भयान संकटातून मोठ्या हिम्मतीने कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याफार उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून तुषार सिंचन पद्धतीने पिके जगविण्यासाठीची कसरत सुरू केली आहे. परंतु, विद्युत भारनियमनामुळे हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत.

काय आहे पिकांची अवस्था?जिल्हाभरात ४७ हजार ८५० हेक्टवर उडीद आहे. हेही पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सुमारे २६ हजार हेक्टवर मुग आहे. शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. ९ हजार ८६० हेक्टवर बाजरीचे पीक आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पिकाखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ९७ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्ष १ लाख ११ हजार ७३८ हेक्टवर पेरणी झाली आहे. पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कापसाची लागवड १९ हजार ७५ हेक्टवर झाली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाखाली २२ हजार ९८ हेक्टवर क्षेत्र आहे. हे पीक सुद्धा वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तर हलक्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नाहीजिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ७६७.५ मिमी एवढे आहे. २२ आॅगस्टअखेर केवळ ३७४.१ मिमी म्हणजेच ४८.७ टक्के पाऊस झाला आहे. यापैकी जून महिन्यात १२७.४ मिमी, जुलै महिन्यात २०३.९ मिमी आणि आॅगस्ट महिन्यात (आजपर्यंत) ४२.८ मिमी म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या २० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात ४२ महसूल मंडळे आहेत. यापैकी १३ मंडळे अशी आहेत, की जेथे ३०० मिमी पेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. विशेषत: या भागातील पिके सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिके वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.----------------