शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

विदर्भातही अवकाळी पाऊस

By admin | Updated: March 17, 2017 03:58 IST

मराठवाड्यात थैमान घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी विदर्भावर ‘अवकाळी’ बरसली. यवतमाळ, अकोल्यासह बुलडाणा, वाशिम तसेच चंद्रपूर

नागपूर/ अकोला : मराठवाड्यात थैमान घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी विदर्भावर ‘अवकाळी’ बरसली. यवतमाळ, अकोल्यासह बुलडाणा, वाशिम तसेच चंद्रपूर, गडचिरोलीला वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने झोडपले. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात दुपारी ४च्या सुमारास दारव्हा, दिग्रस, कळंब, यवतमाळ आदी तालुक्यांत गारपीट व पावसाने हजेरी लावली. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब परिसराला गारपिटीने झोडपून काढले. काही ठिकाणी बोराएवढ्या गारा कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील गहू, हरभरा, संत्रा आदी पिकांना त्याचा फटका बसला आहे. दिग्रस तालुक्यातही सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, घुग्घुस, मूल, सावली आदी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. गडचिरोलीत रात्री ८च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)आजही पावसाची चिन्हे : राज्यात शुक्रवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथे पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली येथे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़बुलडाण्यातजोरदार बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, चिखली, शेगाव, खामगाव, मेहकर तालुक्यासह जिल्ह्यात दुपारी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या वर्षी चांगल्या पिकाची अपेक्षा शेतकरी करीत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. जिल्ह्यात असलेल्या फळबागांनाही पावसाचा फटका बसला आहे. संत्रा गळून पडला असून, आंब्याचा मोहोरही गळला आहे. वाशिम जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मानोरा, मंगरूळपीर, शेलुबाजार परिसरात काही गावांना गारपिटीने झोडपले.