शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर बरसात

By admin | Updated: October 4, 2015 04:30 IST

विजांच्या कडकडाटासह शनिवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, नगर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनांत राज्यात

मुंबई : विजांच्या कडकडाटासह शनिवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, नगर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनांत राज्यात तब्बल २६ जणांना जीव गमवावा लागला. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.वीज पडून मराठवाड्यात सर्वाधिक १३ जणांचा बळी गेला. त्यात परभणी (४), औरंगाबाद (४), जालना (२), उस्मानाबाद (२), लातूर (१) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. विदर्भात नागपूर (४), यवतमाळ (३), वर्धा (१) येथे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये २ तर नगरमध्ये जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील एका मंदिरावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मुंबई व ठाणे जिल्ह्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत जिल्ह्यात १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारीही पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही प्रकल्पांत तब्बल १४२ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून काही घरांचे नुकसान झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)हवेच्या चक्राकार स्थितीमुळे पाऊसनैर्ऋ त्य मोसमी पावसाने (मान्सून) देशातून परतीचा प्रवास सुरू केला असला तरी अजूनही तो उत्तर भारतातच आहे. त्यामुळे देशाच्या मध्य, दक्षिण, ईशान्य व पूर्व भागांमध्ये मान्सूनचा पाऊस अधूनमधून पडत आहे. बंगालच्या उपसागरात हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे.बिहारमधून मान्सून माघारीराजस्थान, पंजाबमध्ये ठाण मांडून बसलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी आगेकूच केली आणि तो बिहारच्या बहुतांश भागातून माघारी गेला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगडच्या काही भागातून मान्सून माघारी गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.