शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

राज्यभर बरसात

By admin | Updated: October 4, 2015 04:30 IST

विजांच्या कडकडाटासह शनिवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, नगर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनांत राज्यात

मुंबई : विजांच्या कडकडाटासह शनिवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, नगर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनांत राज्यात तब्बल २६ जणांना जीव गमवावा लागला. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.वीज पडून मराठवाड्यात सर्वाधिक १३ जणांचा बळी गेला. त्यात परभणी (४), औरंगाबाद (४), जालना (२), उस्मानाबाद (२), लातूर (१) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. विदर्भात नागपूर (४), यवतमाळ (३), वर्धा (१) येथे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये २ तर नगरमध्ये जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील एका मंदिरावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मुंबई व ठाणे जिल्ह्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत जिल्ह्यात १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारीही पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही प्रकल्पांत तब्बल १४२ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून काही घरांचे नुकसान झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)हवेच्या चक्राकार स्थितीमुळे पाऊसनैर्ऋ त्य मोसमी पावसाने (मान्सून) देशातून परतीचा प्रवास सुरू केला असला तरी अजूनही तो उत्तर भारतातच आहे. त्यामुळे देशाच्या मध्य, दक्षिण, ईशान्य व पूर्व भागांमध्ये मान्सूनचा पाऊस अधूनमधून पडत आहे. बंगालच्या उपसागरात हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे.बिहारमधून मान्सून माघारीराजस्थान, पंजाबमध्ये ठाण मांडून बसलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी आगेकूच केली आणि तो बिहारच्या बहुतांश भागातून माघारी गेला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगडच्या काही भागातून मान्सून माघारी गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.