शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?
2
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
3
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
4
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
5
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
6
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
7
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
8
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
9
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
10
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
11
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
12
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
13
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
14
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
15
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
16
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
17
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
18
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
19
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
20
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!

घुंगरु वाजल्यानंतर पडतो पाऊस !

By admin | Updated: July 13, 2016 19:01 IST

होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़

अरविंद हजारे/ऑनलाइन लोकमत

जवळा (अहमदनगर), दि. 13 - पावसासाठी अनेक ठिकाणी होमहवन केले जातात. होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़ पण जामखेड तालुक्यातील जवळा येथे नर्तिकांच्या पायातील घुंगरांचा आवाज झाला की हमखास पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे़ म्हणूनच गावात आषाढी एकादशीला नर्तिका पायात घुंगरु चढवतात़जामखेड तालुक्यातील जवळा येथे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि़१५) रथयात्रेस प्रारंभ होत आहे. जवळेश्वर यात्रेमध्ये नृत्यांगना मोठ्या प्रमाणात नृत्य करण्यासाठी येतात. गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या नर्तिकांच्या पायातील घुंगरु वाजल्यानंतर पाऊस पडतो, अशी आख्यायिका आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़ मात्र, जवळा येथे अद्याप पाऊस नाही़ दरवर्षी आषाढी एकादशीनंतर जवळा येथे मोठा पाऊस होतो़ आषाढी एकादशीनिमित्त गावात आलेल्या नर्तिकांच्या घुंगरांच्या आवाजामुळेच पाऊस पडतो, अशी येथील पिढीजात धारणा आहे़ त्यामुळे या यात्रेला मोठे महत्व असते़ ही रथयात्रा १९ जुलैपर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध एकादशी ते गुरुपौर्णिमा असे ५ दिवस चालते. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वराची आरती करून रथयात्रेस प्रारंभ होतो. गावातील एकूण १० मंडळांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रात्रभर चालतो. नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळा पंचक्रोशीतील हजारो लोक येतात. पहिल्या दिवशी सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरात येऊन जवळेश्वराची आरती करतात. यात्रेमध्ये विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते. शेवटच्या दिवशी म्हणजे ५ व्या दिवशी जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. दुपारी जवळेश्वराची आरती करून मुख्य रस्त्याने मिरवणूक निघते. रथासमोर नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. रथास मोठमोठे दोर लावून ओढले जाते. रथ ओढण्यास ५० ते ६० लोक लागतात. रथाला नारळाचे तोरण अर्पण करतात. जवळजवळ ३०,४० हजार नारळांचे तोरण रथात असते.१०० वर्षांचा रथ राज्यातील सर्वांत मोठा साधारण १०० वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला येदू सुरवसे या सुताराने तो तयार केला आहे. त्यामुळे रथात बसण्याचा मान सुरवसे परिवाराला आहे. अजून रथाची कसलीही मोडतोड झालेली नाही. दरवर्षी रथास तेल लावून मगच त्यात मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते.