शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: October 26, 2014 01:23 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाच्या पट्टयामुळे पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.

मुंबई/पुणो : राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाच्या पट्टयामुळे पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. गेल्या 24 तासात वेंगुर्ला येथे 5क् तर रत्नागिरीत 3क् मिमी पाऊस पडला.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता शनिवारी वाढल्याने हा पाऊस पडत आहे. दिवसभरात कोल्हापूरमध्ये 14 मिमी, पुणो, महाबळेश्वर, सांगली, बुलडाणा येथे प्रत्येकी 3 मिमी, औरंगाबाद, अकोला व अमरावतीमध्ये प्रत्येकी 2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
द्राक्षबागा संकटात
सांगली : शनिवारी सकाळी आठपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने तासगाव, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका फुलो:यातील बागांना बसणार आहे. पाऊस दोन दिवस राहिल्यास द्राक्षघड कुजून पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे सर्व उत्पादकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे आहे. 
 
कोल्हापुरात खरीप पिकांवर ‘पाणी’
कोल्हापूर जिलत शनिवारी दुपारी दीडर्पयत परतीचा पाऊस कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. पीक काढणी ठप्प झाली असून, सुगीलाच ब्रेक लागला आहे. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला आहे. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे.शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारी दीड वाजेर्पयत सुरुच होता़   
सिंधुदुर्गात मुसळधार
सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी वादळी वा:यासह मुसळधार पाऊस झाला़ या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी करून वाळत ठेवलेले भात वाहून गेले, तर कापणीला आलेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. गेल्या 24 तासांत जिलत सरासरी 27.क्2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आह़े 
पश्चिम विदर्भात रिमङिाम
अकोला : शनिवारी अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम या जिलंत रिमङिाम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणो आहे. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिलंत रिमङिाम पाऊस झाला, तर अमरावती व वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ वातावरण होते.  
 
मुंबईत शिडकावा 
च्मुंबईकरांना एकीकडे ऑक्टोबर हीटचे चटके बसत असतानाच दुसरीकडे शनिवारी मात्र मुंबापुरीवर दिवसभर मळभ दाटून आले. 
च्यामुळे वातावरणात गारवा आल्याने ऐन दिवाळीत मुंबईकरांनी थंड वा:याची झुळूक अनुभवली. तसेच मुंबईसह परिसरात शिडकावा झाला़ 
 
च्राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे आज तापमानात मोठी घट नोंदविली गेली. कालर्पयत 37 अंशाच्या घरात असलेले कमाल तापमान घसरून 25 ते 28 अंशाच्या घरात आले. राज्यात सर्वाधिक 35.5 अंश सेल्सिअस तापमान नांदेडमध्ये नोंदविले गेले.