शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या घोषणा हवेतच

By admin | Updated: February 15, 2015 01:16 IST

रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विदर्भासाठी घोषणांमागे घोषणा होतात. मात्र त्यासाठी कासवगतीने निधीचा पुरवठा होत असल्याने हे प्रकल्प रखडले तर आहेतच, शिवाय त्यांचा नियोजित खर्चही वाढला आहे.

दयानंद पाईकराव - नागपूर रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विदर्भासाठी घोषणांमागे घोषणा होतात. मात्र त्यासाठी कासवगतीने निधीचा पुरवठा होत असल्याने हे प्रकल्प रखडले तर आहेतच, शिवाय त्यांचा नियोजित खर्चही वाढला आहे. परिणामी विदर्भ विकासाचे गणित बिघडले आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९ च्या रेल्वे अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटर लांबीच्या ६९७ कोटींच्या प्रकल्पाची घोषणा केली. यवतमाळमध्ये लालूप्रसाद यादव यांनी प्रकल्पाची पायाभरणी केली. २००९-१० मध्ये १५, २०१०-११ मध्ये ४०, २०११-१२ मध्ये ४० आणि २०१२-१३ मध्ये १५ कोटी निधीची तरतूद झाल्याने प्रकल्पाला गती मिळाली नाही. सध्या राज्य शासनाच्या सहकार्याने प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरूअसून सहा वर्षांत वर्धा - यवतमाळ दरम्यान फक्त ३३ किलोमीटर जमीन अधिग्रहित झाली. प्रकल्पाचा खर्च ६९७ कोटींवरून १,६०० कोटींवर गेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. या भागात रेल्वेचे जाळे पसरल्यास शेतमालाला देशभरात पाठवता येईल, अशीही भूमिका आहे. या प्रकल्पासाठी खा. विजय दर्डा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. २०१०-११ च्या रेल्वे अर्थसंकल्पात बडनेरा वॅगन वर्कशॉपचा प्रकल्प जाहीर झाला. सध्या वॅगन झाशी येथे दुरुस्तीसाठी जातात. बडनेराला प्रकल्प झाल्यास सुट्या भागांचे पर्यायी उद्योग उभे राहतील. मात्र २९९.३७ कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आता कित्येक कोटींनी वाढली आहे. नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनच्या कामाला २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. नागपूर-सेवाग्राम मार्गावर १०० ची क्षमता असताना दररोज १५४ रेल्वे चालविण्यात येतात. त्यामुळे देखभालीसाठी वेळ मिळत नाही. ७६ किलोमीटर लांबीच्या थर्ड लाईनचा प्रकल्प झाल्यास नागपूर विभागाला रेल्वे अर्थसंकल्पात अधिक गाड्या मिळतील. २०१२-१३ मध्ये अजनी रेल्वे परिसरात मेकॅनाईज्ड लाँड्री सुरूकरण्याची घोषणा झाली. बीओटी तत्त्वावरील या प्रकल्पासाठी रेल्वे १५ वर्षांचा करार करून कंत्राटदाराला जागा उपलब्ध करून देणार आहे. १५ वर्षांत कंत्राटदाराला ३० कोटींच्या जवळपास रक्कम देण्यात येईल. परंतु या प्रकल्पाबाबतही कुठलेच पाऊल अजून उचलले गेलेले नाही. प्रवाशांना माफत दरात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी २०१२-१३ मध्ये नीर बॉटलिंग प्लान्टची घोषणा झाली. परंतु प्रकल्प पुढे सरकलाच नाही. रेल्वेमंत्री यांच्या घोषणा ही अशाच हवेत विरल्या.अर्थसंकल्पात घोषित केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. प्रकल्प ठराविक वेळेत न झाल्याने त्याचा विकासावरही परिणाम होतो. मुदतीत रेल्वे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे.- विनोद चतुर्वेदी, विभागीय सचिव, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ