शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघात घटले, २0१७ मध्ये दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 02:54 IST

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अपघात होत असतानाच, आता त्याचे प्रमाण घटल्याची बाब निदर्शनास आली

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अपघात होत असतानाच, आता त्याचे प्रमाण घटल्याची बाब निदर्शनास आली आहे. २0१७ मधील गेल्या तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू, तर ८0६ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूंची संख्या पाहता, दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू होत असून, २0१६ मध्ये हेच प्रमाण दिवसाला १0 प्रवाशांचा मृत्यू एवढे होते. मुंबई उपनगरीय मार्गावर होणाऱ्या विविध अपघातांत वर्षाला साडेतीन ते चार हजार प्रवाशांचा मृत्यू होतो, तर जखमी प्रवाशांची संख्याही तेवढी आहे. रेल्वे रूळ ओलांडताना, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, लोकलमधून पडून, खांबाची धडक लागणे, ओव्हरहेड वायरचा शॉक, याबरोबरच नैसर्गिक मृत्यू होणे अशा अपघातांचा समावेश असतो. मोनिका मोरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडल्याने दोन हात गमावले, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात डोंबिवलीच्या भावेश नकाते याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासह रूळ ओलांडताना होणाऱ्या सर्वाधिक अपघातांचे प्रमाण पाहता, रेल्वे प्रशासनाकडून हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. दोन स्थानकांमध्ये पादचारी पूल, सरकते जिने, दोन रुळांमध्ये कुंपण, तसेच शॉर्टकट मार्ग रोखण्यासाठी रुळांजवळील झोपड्यांजवळ संरक्षक भिंत इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.तसेच मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्यावरही भर देण्यात आल्यानंतर, त्याचा परिणाम पाहता, गेल्या तीन महिन्यांत अपघातांचे प्रमाण हे घटले. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>गेल्या चार वर्षांतील अपघातांची आकडेवारीवर्षमृत्यूजखमी२0१३३,५१३३,५६३२0१४३,४२९३,२९९२0१५३,३0५३,३५१२0१६३,२0८३,४४५