शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रेल्वे अपघात घटले, २0१७ मध्ये दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 02:54 IST

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अपघात होत असतानाच, आता त्याचे प्रमाण घटल्याची बाब निदर्शनास आली

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अपघात होत असतानाच, आता त्याचे प्रमाण घटल्याची बाब निदर्शनास आली आहे. २0१७ मधील गेल्या तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू, तर ८0६ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूंची संख्या पाहता, दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू होत असून, २0१६ मध्ये हेच प्रमाण दिवसाला १0 प्रवाशांचा मृत्यू एवढे होते. मुंबई उपनगरीय मार्गावर होणाऱ्या विविध अपघातांत वर्षाला साडेतीन ते चार हजार प्रवाशांचा मृत्यू होतो, तर जखमी प्रवाशांची संख्याही तेवढी आहे. रेल्वे रूळ ओलांडताना, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, लोकलमधून पडून, खांबाची धडक लागणे, ओव्हरहेड वायरचा शॉक, याबरोबरच नैसर्गिक मृत्यू होणे अशा अपघातांचा समावेश असतो. मोनिका मोरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडल्याने दोन हात गमावले, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात डोंबिवलीच्या भावेश नकाते याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासह रूळ ओलांडताना होणाऱ्या सर्वाधिक अपघातांचे प्रमाण पाहता, रेल्वे प्रशासनाकडून हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. दोन स्थानकांमध्ये पादचारी पूल, सरकते जिने, दोन रुळांमध्ये कुंपण, तसेच शॉर्टकट मार्ग रोखण्यासाठी रुळांजवळील झोपड्यांजवळ संरक्षक भिंत इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.तसेच मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्यावरही भर देण्यात आल्यानंतर, त्याचा परिणाम पाहता, गेल्या तीन महिन्यांत अपघातांचे प्रमाण हे घटले. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>गेल्या चार वर्षांतील अपघातांची आकडेवारीवर्षमृत्यूजखमी२0१३३,५१३३,५६३२0१४३,४२९३,२९९२0१५३,३0५३,३५१२0१६३,२0८३,४४५