शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रायकर, कुवळेकर, जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: January 29, 2015 06:01 IST

पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि योगदानाबद्दल ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर (२०१३), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर

मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि योगदानाबद्दल ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर (२०१३), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (२०१२) आणि ल. त्र्यं. जोशी (२०११) यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देऊन राज्य शासनाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीन वर्षांतील या तीन पुरस्कारांचा वितरण समारंभ ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. ‘लोकमत’चे समूह संपादक असलेले दिनकर रायकर यांना पत्रकारितेचा सुमारे ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इंडियन एक्स्प्रेसचे वार्ताहर ते मुंबई आवृत्तीचे संपादक तसेच लोकमत आणि लोकमत टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून  त्यांनी काम पाहिले. पत्रकारितेतील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. कुवळेकर यांना ३३ वर्षांच्या पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असून लोकमत, सकाळचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. लक्ष्मणराव जोशी हे नागपूरच्या लोकशाही वार्ताचे संपादक असून ४५ वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारितेत आहेत. तरुण भारतचे संपादक म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली. गोमंतक, गोवादूतचेही ते संपादक होते. राज्य शासनाच्या वतीने विविध गटांत देण्यात येणाऱ्या गेल्या तीन वर्षांतील पत्रकारिता पुरस्कारांची घोषणाही आज झाली. २०११ मधील अन्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये शेख रिजवान,खलिल, इरशाद बागवान, नागेश दाचेवार, भिकाजी चेचर, चारु शीला कुलकर्णी, रवी गाडेकर, अमिता बडे, गणेश कोरे, जान्हवी सराटे यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)> पुरस्कारांवर लोकमतची छापविविध गटांतील पत्रकारिता पुरस्कारांवर लोकमतने मोहोर उमटविली. लोकमत समाचार; जळगावचे मुकेश शर्मा यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (४१ हजार), लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे यांना शि.म.परांजपे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; अकोलाचे वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना लोकनायक बापुजी अणे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे उपसंपादक मिलिंद कीर्ती यांना ग.त्र्य.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार), लोकमत; मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना आचार्य अत्रे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार) आणि लोकमत; साताराचे वार्ताहर मोहन मस्कर-पाटील (४१ हजार) हे मानकरी ठरले.