शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

रायगड औद्योगिक क्रांतीचा पहिला जिल्हा बनेल

By admin | Updated: February 16, 2017 04:49 IST

रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा पहिल्या क्र मांकाचा जिल्हा बनणार आहे, कारण याच ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्ट

पनवेल : रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा पहिल्या क्र मांकाचा जिल्हा बनणार आहे, कारण याच ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्टच्या रूपाने एअर कार्गो व जेएनपीटी असल्याने हे नक्कीच शक्य होणार आहे. मुंबई विमानतळाची क्षमता संपली आहे, यामुळे पर्यटक देखील याठिकाणी कमी प्रमाणात येत आहेत. अनेक एअर लाइन्स याठिकाणी आपली सेवा पुरवण्यास इच्छुक आहेत. मात्र अपुऱ्या जागेअभावी हे शक्य होत नाही. नवी मुंबई विमानतळ व एअर कार्गो सुरू होणार असल्याने पर्यटनाला देखील नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ उलवे येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण ज्या प्रकारे एखादी चांगली बँक बघून आपले पैसे जमा करतो, यासारखेच राजकीय पक्षाचे देखील आहे. तुमच्यासमोर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासारख्या मतदानाच्या बँकांचा पर्याय आहे. मात्र यापैकी आमची भाजपा बँकच सर्वोत्कृष्ट आहे. जी तुमच्या मतांच्या रूपात ठेवलेल्या डिपॉझिटवर योग्य रूपाने तुम्हाला पाच वर्षांनी परत करू. आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकांचा पर्याय निवडल्यास त्या बँकांची अवस्था पेण अर्बन बँकेसारखी होईल, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. रायगड जिल्ह्यात भाजपा पंचायत समितीच्या ८२ आणि जिल्हा परिषदेच्या ४१ जागांवर निवडणूक लढत आहे. राज्यात भाजपाचे सरकार आहे त्याच प्रकारे तळागाळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जागेवर देखील भाजपाचे कमळ फुलविण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे नैना क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याची आणि प्रकल्पग्रस्तांच्या लीज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याची, तसेच एसईझेड रद्द करून दुसरे उद्योग याठिकाणी आणून स्थानिकांना त्यामध्ये सामावून घेण्याची मागणी केली. या जाहीर सभेला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जगदीश गायकवाड आदींसह गव्हाण जिल्हा परिषद गटाचे उमेदवार हेमंत ठाकूर, पंचायत समिती गण उमेदवार रत्नप्रभा घरत आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उलवा येथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)