शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

By admin | Updated: November 21, 2015 01:41 IST

बँकांच्या टोलवाटोलवीने शेतकरी त्रस्त.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) खरीप पिकांचे उत्पादन घटले असून, शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे; परंतु रब्बी पेरणीवरही परिणाम होत असल्याने शेतकर्‍यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात पीक विमा काढण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यासाठीच शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून मोठी अपेक्षा होती. परंतु यावर्षी मुख्यत्वे वर्‍हाडातील चित्र वाईट आहे. रब्बीसाठी शेतात ओलावा नाही, याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकर्‍यांनी केली; तथापि शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो, पण मुगाच्या शेतातही हरभरा उगवला नाही. गहू पेरणीची ही वेळ आहे; तथापि गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, पीक विमा काढण्यासाठी भटकत आहे. कृषी विभागाने पीक विम्यासाठी बँकांच्या मुख्य शाखांना पत्र दिले आहे. परंतु मुख्य शाखेकडून अद्याप हे पत्र त्यांच्या शाखांना पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतकर्‍यांच्या वार्‍या सुरू आहेत. दरम्यान, गतवर्षी या विभागातील ३९,७२७ शेतकर्‍यांनी रब्बीचा पीक विमा काढला होता. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६ हजार ९८७ शेतकर्‍यांनी ६ लाख ३७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ातील १ हजार २५३ शेतकर्‍यांनी १ लाख ५६ हजार रुपये भरू न पीक विमा काढला आहे. अकोला जिल्हय़ातील २५ हजार ७८३ शेतकर्‍यांनी ८३ लाख २१ हजार रुपयांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील ३ हजार १९९ शेतकर्‍यांनी १५ लाख ९९ हजार रुपयांचा पीक विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २ हजार ५९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ७४ हजार रुपये हप्ता भरू न पीक विमा काढला आहे. या शेतकर्‍यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.