शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

By admin | Updated: November 21, 2015 01:41 IST

बँकांच्या टोलवाटोलवीने शेतकरी त्रस्त.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) खरीप पिकांचे उत्पादन घटले असून, शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे; परंतु रब्बी पेरणीवरही परिणाम होत असल्याने शेतकर्‍यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात पीक विमा काढण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यासाठीच शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून मोठी अपेक्षा होती. परंतु यावर्षी मुख्यत्वे वर्‍हाडातील चित्र वाईट आहे. रब्बीसाठी शेतात ओलावा नाही, याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकर्‍यांनी केली; तथापि शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो, पण मुगाच्या शेतातही हरभरा उगवला नाही. गहू पेरणीची ही वेळ आहे; तथापि गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, पीक विमा काढण्यासाठी भटकत आहे. कृषी विभागाने पीक विम्यासाठी बँकांच्या मुख्य शाखांना पत्र दिले आहे. परंतु मुख्य शाखेकडून अद्याप हे पत्र त्यांच्या शाखांना पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतकर्‍यांच्या वार्‍या सुरू आहेत. दरम्यान, गतवर्षी या विभागातील ३९,७२७ शेतकर्‍यांनी रब्बीचा पीक विमा काढला होता. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६ हजार ९८७ शेतकर्‍यांनी ६ लाख ३७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ातील १ हजार २५३ शेतकर्‍यांनी १ लाख ५६ हजार रुपये भरू न पीक विमा काढला आहे. अकोला जिल्हय़ातील २५ हजार ७८३ शेतकर्‍यांनी ८३ लाख २१ हजार रुपयांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील ३ हजार १९९ शेतकर्‍यांनी १५ लाख ९९ हजार रुपयांचा पीक विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २ हजार ५९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ७४ हजार रुपये हप्ता भरू न पीक विमा काढला आहे. या शेतकर्‍यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.