शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

By admin | Updated: November 21, 2015 01:41 IST

बँकांच्या टोलवाटोलवीने शेतकरी त्रस्त.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) खरीप पिकांचे उत्पादन घटले असून, शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे; परंतु रब्बी पेरणीवरही परिणाम होत असल्याने शेतकर्‍यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात पीक विमा काढण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यासाठीच शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून मोठी अपेक्षा होती. परंतु यावर्षी मुख्यत्वे वर्‍हाडातील चित्र वाईट आहे. रब्बीसाठी शेतात ओलावा नाही, याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकर्‍यांनी केली; तथापि शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो, पण मुगाच्या शेतातही हरभरा उगवला नाही. गहू पेरणीची ही वेळ आहे; तथापि गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, पीक विमा काढण्यासाठी भटकत आहे. कृषी विभागाने पीक विम्यासाठी बँकांच्या मुख्य शाखांना पत्र दिले आहे. परंतु मुख्य शाखेकडून अद्याप हे पत्र त्यांच्या शाखांना पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतकर्‍यांच्या वार्‍या सुरू आहेत. दरम्यान, गतवर्षी या विभागातील ३९,७२७ शेतकर्‍यांनी रब्बीचा पीक विमा काढला होता. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६ हजार ९८७ शेतकर्‍यांनी ६ लाख ३७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ातील १ हजार २५३ शेतकर्‍यांनी १ लाख ५६ हजार रुपये भरू न पीक विमा काढला आहे. अकोला जिल्हय़ातील २५ हजार ७८३ शेतकर्‍यांनी ८३ लाख २१ हजार रुपयांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील ३ हजार १९९ शेतकर्‍यांनी १५ लाख ९९ हजार रुपयांचा पीक विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २ हजार ५९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ७४ हजार रुपये हप्ता भरू न पीक विमा काढला आहे. या शेतकर्‍यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.