शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

By admin | Updated: November 21, 2015 01:41 IST

बँकांच्या टोलवाटोलवीने शेतकरी त्रस्त.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) खरीप पिकांचे उत्पादन घटले असून, शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे; परंतु रब्बी पेरणीवरही परिणाम होत असल्याने शेतकर्‍यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात पीक विमा काढण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यासाठीच शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून मोठी अपेक्षा होती. परंतु यावर्षी मुख्यत्वे वर्‍हाडातील चित्र वाईट आहे. रब्बीसाठी शेतात ओलावा नाही, याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकर्‍यांनी केली; तथापि शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो, पण मुगाच्या शेतातही हरभरा उगवला नाही. गहू पेरणीची ही वेळ आहे; तथापि गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, पीक विमा काढण्यासाठी भटकत आहे. कृषी विभागाने पीक विम्यासाठी बँकांच्या मुख्य शाखांना पत्र दिले आहे. परंतु मुख्य शाखेकडून अद्याप हे पत्र त्यांच्या शाखांना पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतकर्‍यांच्या वार्‍या सुरू आहेत. दरम्यान, गतवर्षी या विभागातील ३९,७२७ शेतकर्‍यांनी रब्बीचा पीक विमा काढला होता. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६ हजार ९८७ शेतकर्‍यांनी ६ लाख ३७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ातील १ हजार २५३ शेतकर्‍यांनी १ लाख ५६ हजार रुपये भरू न पीक विमा काढला आहे. अकोला जिल्हय़ातील २५ हजार ७८३ शेतकर्‍यांनी ८३ लाख २१ हजार रुपयांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील ३ हजार १९९ शेतकर्‍यांनी १५ लाख ९९ हजार रुपयांचा पीक विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २ हजार ५९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ७४ हजार रुपये हप्ता भरू न पीक विमा काढला आहे. या शेतकर्‍यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.