शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने आत्मक्लेश!

By admin | Updated: May 21, 2017 02:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने आम्ही आत्मक्लेश करून घेत आहोत. त्यासाठी २२ मेपासून पुण्यातून ‘आत्मक्लेश पदयात्रा’ काढत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अडचणींवर मात करत, शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून हमीभावाने तूर घेण्याऐवजी सरकार हात वर करत आहे. भाजीपाला, कांदा, फळे व इतर शेतमालालाही मातीमोल भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्याला मदत करण्याची, त्याच्यावरील कर्जाचा भार काढण्याची सरकारची भूमिका नाही. त्यामुळेच आमच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पुण्यात सोमवारी सकाळी फुले वाडा येथून पदयात्रा सुरू होईल. नऊ दिवसांत ठिकठिकाणी मुक्कामाचे टप्पे ठरविले आहेत. २९ मे रोजी यात्रा मुंबईत आल्यानंतर, ३० मे रोजी राजभवनकडे प्रस्थान करण्यात येईल. शहरवासीयांनो सहभागी व्हा!नोकरदार वर्ग, प्राध्यापक, कलावंत, शहरी लोकांनी किमान एक दिवस यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. अनेकांनी यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजी-भाकरीची मदत यात्रेसाठी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. पाचशे, हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत लोकांनी देणग्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धान्यापासून, कांदे-बटाटे, द्रोण-पत्रावळी अशी मदत दिली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी देण्याचे नियोजन केले आहे.