शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने आत्मक्लेश!

By admin | Updated: May 21, 2017 02:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने आम्ही आत्मक्लेश करून घेत आहोत. त्यासाठी २२ मेपासून पुण्यातून ‘आत्मक्लेश पदयात्रा’ काढत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अडचणींवर मात करत, शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून हमीभावाने तूर घेण्याऐवजी सरकार हात वर करत आहे. भाजीपाला, कांदा, फळे व इतर शेतमालालाही मातीमोल भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्याला मदत करण्याची, त्याच्यावरील कर्जाचा भार काढण्याची सरकारची भूमिका नाही. त्यामुळेच आमच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पुण्यात सोमवारी सकाळी फुले वाडा येथून पदयात्रा सुरू होईल. नऊ दिवसांत ठिकठिकाणी मुक्कामाचे टप्पे ठरविले आहेत. २९ मे रोजी यात्रा मुंबईत आल्यानंतर, ३० मे रोजी राजभवनकडे प्रस्थान करण्यात येईल. शहरवासीयांनो सहभागी व्हा!नोकरदार वर्ग, प्राध्यापक, कलावंत, शहरी लोकांनी किमान एक दिवस यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. अनेकांनी यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजी-भाकरीची मदत यात्रेसाठी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. पाचशे, हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत लोकांनी देणग्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धान्यापासून, कांदे-बटाटे, द्रोण-पत्रावळी अशी मदत दिली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी देण्याचे नियोजन केले आहे.