शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने आत्मक्लेश!

By admin | Updated: May 21, 2017 02:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने आम्ही आत्मक्लेश करून घेत आहोत. त्यासाठी २२ मेपासून पुण्यातून ‘आत्मक्लेश पदयात्रा’ काढत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अडचणींवर मात करत, शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून हमीभावाने तूर घेण्याऐवजी सरकार हात वर करत आहे. भाजीपाला, कांदा, फळे व इतर शेतमालालाही मातीमोल भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्याला मदत करण्याची, त्याच्यावरील कर्जाचा भार काढण्याची सरकारची भूमिका नाही. त्यामुळेच आमच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पुण्यात सोमवारी सकाळी फुले वाडा येथून पदयात्रा सुरू होईल. नऊ दिवसांत ठिकठिकाणी मुक्कामाचे टप्पे ठरविले आहेत. २९ मे रोजी यात्रा मुंबईत आल्यानंतर, ३० मे रोजी राजभवनकडे प्रस्थान करण्यात येईल. शहरवासीयांनो सहभागी व्हा!नोकरदार वर्ग, प्राध्यापक, कलावंत, शहरी लोकांनी किमान एक दिवस यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. अनेकांनी यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजी-भाकरीची मदत यात्रेसाठी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. पाचशे, हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत लोकांनी देणग्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धान्यापासून, कांदे-बटाटे, द्रोण-पत्रावळी अशी मदत दिली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी देण्याचे नियोजन केले आहे.