शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने आत्मक्लेश!

By admin | Updated: May 21, 2017 02:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने आम्ही आत्मक्लेश करून घेत आहोत. त्यासाठी २२ मेपासून पुण्यातून ‘आत्मक्लेश पदयात्रा’ काढत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अडचणींवर मात करत, शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून हमीभावाने तूर घेण्याऐवजी सरकार हात वर करत आहे. भाजीपाला, कांदा, फळे व इतर शेतमालालाही मातीमोल भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्याला मदत करण्याची, त्याच्यावरील कर्जाचा भार काढण्याची सरकारची भूमिका नाही. त्यामुळेच आमच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पुण्यात सोमवारी सकाळी फुले वाडा येथून पदयात्रा सुरू होईल. नऊ दिवसांत ठिकठिकाणी मुक्कामाचे टप्पे ठरविले आहेत. २९ मे रोजी यात्रा मुंबईत आल्यानंतर, ३० मे रोजी राजभवनकडे प्रस्थान करण्यात येईल. शहरवासीयांनो सहभागी व्हा!नोकरदार वर्ग, प्राध्यापक, कलावंत, शहरी लोकांनी किमान एक दिवस यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. अनेकांनी यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजी-भाकरीची मदत यात्रेसाठी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. पाचशे, हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत लोकांनी देणग्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धान्यापासून, कांदे-बटाटे, द्रोण-पत्रावळी अशी मदत दिली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी देण्याचे नियोजन केले आहे.