शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

शालेय शिक्षणमंत्र्यांकडून गुणवंतांचे कौतुक

By admin | Updated: July 21, 2014 13:12 IST

इयत्ता दहावी आणि बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंतांना अभिनंदनाचे पत्र लिहून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कौतुकाची थाप दिली

 

पालक भारावले : राजेंद्र दर्डा यांचे दहावी आणि बारावीच्या ७,६२३ विद्यार्थ्यांना पत्र

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंतांना अभिनंदनाचे पत्र लिहून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कौतुकाची थाप दिली. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश मिळविले आहे. पालक, शिक्षक आणि शाळेसाठी हा क्षण अभिमानाने भारावून जाणारा आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी हेच महाराष्ट्राचे खरे रत्न असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि सीबीएसईच्या दहावी-बारावीत चांगले गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. दहावीत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणार्‍या ५ हजार १८0 आणि बारावीत ९0 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणार्‍या २ हजार ४४३ विद्यार्थ्यांना हे अभिनंदनाचे पत्र पाठिवले असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.  या पत्रांना पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. काहींनी मला फोन केले तर, काहींनी पत्राद्वारे उत्तर दिले, काहींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्याचे दर्डा यांनी सांगितले.  यातील एक उदाहरण सांगताना ते म्हणाले, एआयआयएमएसला प्रवेश निश्‍चित झालेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला या पत्राने आश्‍चर्याचा धक्का बसला. पालक म्हणतात, मंत्र्यांकडून असे अभिनंदनाचे पत्र मिळणे, हे आमच्या मुलीच्या जिद्दीला चालना देणारे ठरले. माझ्यासारख्या विद्यार्थ्याचे कौतुक करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेळ काढल्याने मी प्रचंड आनंदी झालो आहे, असे ठाणे शहरातील अभिषेक म्हणाला. 

अशी सुचली कल्पना.. ही कल्पना कशी सुचली, याबाबत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, बारावीत ९६ टक्के गुण घेतलेला एक गुणवंत विद्यार्थी मुंबईच्या कार्यालयात मला भेटायला आला होता. मी त्याला विचारले, 'मेरिट'मध्ये आल्यामुळे तुझे खूप कौतुक झाले असेल. तेव्हा तो काहीशा निराशेने म्हणाला, माझ्या आईला यातले काही कळत नाही आणि वडील सकाळीच मजुरीला निघून जातात. शेजार्‍यांना फारसे काही वाटत नाही. त्याच्याप्रमाणेच अनेक विद्यार्थी असे कौतुकापासून दूर असतील, असे मला वाटले व त्यातूनच त्यांचे कौतुक करण्याची कल्पना सुचली. शिवाय गुणवंतांचे राज्य शासनाकडून कौतुक होत असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल. महाराष्ट्रात मोठे टॅलेंट आहे. या कौतुकामुळे ते अधिक बहरेल, असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले.

(प्रतिनिधी)