शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणमंत्र्यांकडून गुणवंतांचे कौतुक

By admin | Updated: July 21, 2014 13:12 IST

इयत्ता दहावी आणि बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंतांना अभिनंदनाचे पत्र लिहून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कौतुकाची थाप दिली

 

पालक भारावले : राजेंद्र दर्डा यांचे दहावी आणि बारावीच्या ७,६२३ विद्यार्थ्यांना पत्र

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंतांना अभिनंदनाचे पत्र लिहून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कौतुकाची थाप दिली. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश मिळविले आहे. पालक, शिक्षक आणि शाळेसाठी हा क्षण अभिमानाने भारावून जाणारा आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी हेच महाराष्ट्राचे खरे रत्न असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि सीबीएसईच्या दहावी-बारावीत चांगले गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. दहावीत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणार्‍या ५ हजार १८0 आणि बारावीत ९0 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणार्‍या २ हजार ४४३ विद्यार्थ्यांना हे अभिनंदनाचे पत्र पाठिवले असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.  या पत्रांना पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. काहींनी मला फोन केले तर, काहींनी पत्राद्वारे उत्तर दिले, काहींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्याचे दर्डा यांनी सांगितले.  यातील एक उदाहरण सांगताना ते म्हणाले, एआयआयएमएसला प्रवेश निश्‍चित झालेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला या पत्राने आश्‍चर्याचा धक्का बसला. पालक म्हणतात, मंत्र्यांकडून असे अभिनंदनाचे पत्र मिळणे, हे आमच्या मुलीच्या जिद्दीला चालना देणारे ठरले. माझ्यासारख्या विद्यार्थ्याचे कौतुक करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेळ काढल्याने मी प्रचंड आनंदी झालो आहे, असे ठाणे शहरातील अभिषेक म्हणाला. 

अशी सुचली कल्पना.. ही कल्पना कशी सुचली, याबाबत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, बारावीत ९६ टक्के गुण घेतलेला एक गुणवंत विद्यार्थी मुंबईच्या कार्यालयात मला भेटायला आला होता. मी त्याला विचारले, 'मेरिट'मध्ये आल्यामुळे तुझे खूप कौतुक झाले असेल. तेव्हा तो काहीशा निराशेने म्हणाला, माझ्या आईला यातले काही कळत नाही आणि वडील सकाळीच मजुरीला निघून जातात. शेजार्‍यांना फारसे काही वाटत नाही. त्याच्याप्रमाणेच अनेक विद्यार्थी असे कौतुकापासून दूर असतील, असे मला वाटले व त्यातूनच त्यांचे कौतुक करण्याची कल्पना सुचली. शिवाय गुणवंतांचे राज्य शासनाकडून कौतुक होत असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल. महाराष्ट्रात मोठे टॅलेंट आहे. या कौतुकामुळे ते अधिक बहरेल, असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले.

(प्रतिनिधी)