शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पूल खचला तरी पीडब्ल्यूडी झोपेतच!

By admin | Updated: November 10, 2014 04:16 IST

आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले

संजय जाधव, पैठणआपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पुलाच्या पायाखाली बेसुमार वाळू उपसा होत असताना या विभागाने महसूल किंवा पोलीस खात्याला साधे पत्र लिहून हे थांबविण्याबाबत कळविलेले नाही. यामुळे वाळू उपशाला महसूल, पोलीस आणि आता बांधकाम विभागाचेही अभय होते, असे उघड झाले आहे. शनिवारी पैठण तालुक्यातील आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा गोदावरी नदीवरील पूल अचानक खचला होता. यानंतर गावकऱ्यांनी वेळीच वाहतूक बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी संध्याकाळी सात वाजता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यू. के. आहेर, उपविभागीय अभियंता शेगोकार, शाखा अभियंता बी.बी. जायभाये आदींनी भेट देऊन पाहणी केली. तसेच आपेगाव-कुरणपिंप्री पुलाची तपासणी करण्यासाठी सोमवार १० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तज्ज्ञ पथक येणार असल्याचे उपविभागीय अभियंता एन.बी. चौरे यांनी सांगितले. पुलावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद होती. वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेबाबत वरिष्ठ स्तरावर सोमवारी निर्णय घेण्यात येईल, असेही चौरे म्हणाले. या प्रकारामुळे प्रशासनातील लालफितीचा कारभारच चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.