शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या इराद्याला सेनेचा धक्का

By admin | Updated: April 25, 2015 02:38 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढून किमान ११० ते कमाल १४२ जागांवर विजय मिळवण्याच्या भाजपाच्या इराद्यांना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढून किमान ११० ते कमाल १४२ जागांवर विजय मिळवण्याच्या भाजपाच्या इराद्यांना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निकालाने धक्का बसल्याची पक्षात चर्चा आहे. शिवसेनेचा सत्तेमुळे वाढता दबदबा मुंबईसह अन्य महापालिकांत डोकेदुखी ठरण्याची भीती भाजपा वर्तुळात व्यक्त होत आहे.नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला जेमतेम ६ जागा मिळाल्या तर औरंगाबाद महापालिकेत पक्षाच्या जागांची संख्या वाढली असली तरी एमआयएमने भाजपाला पिछाडीवर टाकल्याने पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. राज्यातील सत्तेत मोठा भागीदार असलेल्या पक्षाची ही परिस्थिती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिकांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारी असल्याचे पक्षातील काहींचे मत आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल व किमान ११० ते १४२ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास मुंबईतील भाजपाच्या एका मातब्बर नेत्याने व्यक्त केला होता. विकास आराखडा, मेट्रो, कोस्टल रोड अशा सर्वच प्रश्नांवर भाजपाने सर्वप्रथम भूमिका घेण्यामागे महापालिकेत मुसंडी मारणे हाच हेतू असल्याचे हा नेता म्हणाला. मुंबई महापालिकेतील शिवसेनेबरोबरच्या युतीत आतापर्यंत भाजपा हा दुय्यम पक्ष राहिला आहे. मागील निवडणुकीत भाजपा ६३ जागा लढला व त्यांचे ३१ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवायची तर २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेत भाजपाला किमान १०० उमेदवार बाहेरून गोळा करावे लागतील. नवी मुंबईत भाजपाने ४३ जागा लढवल्या. त्यामध्ये केवळ एक उमेदवार हा मूळ भाजपाचा होता. बाकी ४२ उमेदवार हे आयाराम होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आयारामांच्या भरवशावर महापालिका काबीज करु पाहणाऱ्या भाजपाला नवी मुंबईतील मतदारांनी झटका दिला. मुंबईत तशाच पद्धतीने बाहेरून लोक आणून स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विचार भाजपाचे नेते करीत असतील तर त्याचा फटका बसू शकतो, असे भाजपातील काहींचे मत आहे.शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे की नाही यावर भाजपात दोन मतप्रवाह होते. शिवसेनेने सत्तेत सहभागी झाल्यावर सत्तेपासून ताकद मिळवली आणि भाजपावर वेगवेगळ््या समस्यांकरिता हल्ले करीत विरोधी पक्षाची स्पेस काबीज केल्याचा लाभ त्या पक्षाला झाला आहे. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक नसती तर शिवसेनेने भाजपासोबत युती केली नसती, असे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)