शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

भाजपाच्या इराद्याला सेनेचा धक्का

By admin | Updated: April 25, 2015 02:38 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढून किमान ११० ते कमाल १४२ जागांवर विजय मिळवण्याच्या भाजपाच्या इराद्यांना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढून किमान ११० ते कमाल १४२ जागांवर विजय मिळवण्याच्या भाजपाच्या इराद्यांना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निकालाने धक्का बसल्याची पक्षात चर्चा आहे. शिवसेनेचा सत्तेमुळे वाढता दबदबा मुंबईसह अन्य महापालिकांत डोकेदुखी ठरण्याची भीती भाजपा वर्तुळात व्यक्त होत आहे.नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला जेमतेम ६ जागा मिळाल्या तर औरंगाबाद महापालिकेत पक्षाच्या जागांची संख्या वाढली असली तरी एमआयएमने भाजपाला पिछाडीवर टाकल्याने पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. राज्यातील सत्तेत मोठा भागीदार असलेल्या पक्षाची ही परिस्थिती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिकांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारी असल्याचे पक्षातील काहींचे मत आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल व किमान ११० ते १४२ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास मुंबईतील भाजपाच्या एका मातब्बर नेत्याने व्यक्त केला होता. विकास आराखडा, मेट्रो, कोस्टल रोड अशा सर्वच प्रश्नांवर भाजपाने सर्वप्रथम भूमिका घेण्यामागे महापालिकेत मुसंडी मारणे हाच हेतू असल्याचे हा नेता म्हणाला. मुंबई महापालिकेतील शिवसेनेबरोबरच्या युतीत आतापर्यंत भाजपा हा दुय्यम पक्ष राहिला आहे. मागील निवडणुकीत भाजपा ६३ जागा लढला व त्यांचे ३१ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवायची तर २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेत भाजपाला किमान १०० उमेदवार बाहेरून गोळा करावे लागतील. नवी मुंबईत भाजपाने ४३ जागा लढवल्या. त्यामध्ये केवळ एक उमेदवार हा मूळ भाजपाचा होता. बाकी ४२ उमेदवार हे आयाराम होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आयारामांच्या भरवशावर महापालिका काबीज करु पाहणाऱ्या भाजपाला नवी मुंबईतील मतदारांनी झटका दिला. मुंबईत तशाच पद्धतीने बाहेरून लोक आणून स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विचार भाजपाचे नेते करीत असतील तर त्याचा फटका बसू शकतो, असे भाजपातील काहींचे मत आहे.शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे की नाही यावर भाजपात दोन मतप्रवाह होते. शिवसेनेने सत्तेत सहभागी झाल्यावर सत्तेपासून ताकद मिळवली आणि भाजपावर वेगवेगळ््या समस्यांकरिता हल्ले करीत विरोधी पक्षाची स्पेस काबीज केल्याचा लाभ त्या पक्षाला झाला आहे. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक नसती तर शिवसेनेने भाजपासोबत युती केली नसती, असे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)