शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - तुर्कस्थानमध्ये गेलेला शालेय क्रीडा संघ सुखरुप

By admin | Updated: July 16, 2016 17:02 IST

तुर्कस्थानमध्ये झालेल्या लष्करी उठावाच्या पार्श्वभूमीवर येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला भारतीय संघ सुखरुप असल्याचे या संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले

ऑनलाइन लोकमत - 
महाराष्ट्रातील १८ विद्यार्थी : गेम्सव्हिलेजमध्ये दुतावासातील अधिकारीही सोबत 
पुणे, दि. 16 - तुर्कस्थानमध्ये झालेल्या लष्करी उठावाच्या पार्श्वभूमीवर येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला भारतीय संघ सुखरुप असल्याचे या संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले. 
 
तुर्कस्थानमध्ये ११ ते १८ तारखेपर्यंत जागतिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सुमारे १८ विद्यार्थी गेले आहेत. तुर्कस्थानमधील ट्रॅपझोन या शहरातील गेम्सव्हिलेजमध्ये या स्पर्धा सुरू आहेत. मात्र, शुक्रवारी येथे अचानक लष्करी उठाव झाला. यामुळे यादवीसदृश परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी पहाटे हे वृत्त आल्यावर या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. पुण्यातील एक पालक यांनी ट्विट करून या प्रकाराची माहिती दिली. त्याची तातडीने दखल घेऊन विदेश मंत्रालयाकडून याबाबतची सर्व माहिती घेण्यात आली. तुर्कस्थानच्या भारतीय दुतावासाचे फोन नंबरही देण्यात आले. त्यानंतर लगेचच तुर्कस्थानच्या दुतावासातून या पालकांना सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे कळविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना गेम्सझोनमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे. 
 
दीपा आवटी- हिरे यांची कन्या सिध्दी अ‍ॅथलेटिक्ससाठी गेली आहे. त्यांनाही स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिका-यांनी सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे कळविण्यात आले आहे. अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षक सुभाष पवार तेथे असून त्यांनीही सर्व पालकांशी संपर्क साधला आहे. पुण्यातील शैलेश मानकर यांचा मुलगा सुजय हा स्विमींग स्पर्धेसाठी तुर्कस्थानला गेला आहे. त्यांनाही आज सकाळी तुर्कस्थानहून जलतरणचे प्रशिक्षक साहू यांचा फोन आला. सुजयशीही त्यांचे बोलणे करून देण्यात आले. 
 
या स्पर्धांसाठी संपूर्ण देशातून विद्यार्थी गेले असून महाराष्ट्रातील १८ विद्यार्थी २ जुलै रोजी दिल्ली येथे शिबिरासाठी गेले. तेथूनच १० तारखेला हे विद्यार्थी तुर्कस्थानला गेले. १९ जुलै रोजी हे सर्व विद्यार्थी दिल्लीला पोहोचणार आहे. 
 
महाराष्ट्राचे संघ व्यवस्थापक राहुल कदम यांच्याशी ‘लोकमत’ने व्हॉटसअ‍ॅपद्वारे संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्तंबुल आणि अंकारा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही तेथून १२०० किलोमीटर अंतरावरील शहरात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघातील सर्व जण सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.