शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

पाणी समजून चिमुकल्याने प्यायलं अ‍ॅसिड

By admin | Updated: October 11, 2016 02:51 IST

मीरा रोड येथे राहणाऱ्या राजवीर कन्होजीया (वय ४) या बालकाने पाणी समजून वाहनांच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे सलफ्युरिक अ‍ॅसिड प्यायल्याची

मीरा रोड : मीरा रोड येथे राहणाऱ्या राजवीर कन्होजीया (वय ४) या बालकाने पाणी समजून वाहनांच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे सलफ्युरिक अ‍ॅसिड प्यायल्याची घटना घडली आहे. राजवीरवर मीरा रोड येथील सध्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. राजवीरच्या घरात एका बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत सलफ्युरिक अ‍ॅसिड होते. तहान लागल्याने राजवीरने पाणी समजून ते प्राशन केले. त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले. तसेच रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांची धावपळ उडाली. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागताच परिसरातील खाजगी रु ग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची प्रकृती खालावू लागल्याने त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने मीरा रोड येथील वोक्हार्ट रु ग्णालयात हलवण्यात आले. त्यात सात तासांचा विलंब झाल्याने राजवीरच्या शरीरातील हिमोग्लोबिन वेगाने घटू लागले. त्यावेळी डॉ. ललित वर्मा यांच्या पथकाने त्वरित राजवीरच्या पोटातील लहान, मोठ्या आतड्यांची एन्डोस्कोपी करण्यास सुरु वात केली. सलफ्युरिक अ‍ॅसिडमुळे त्याच्या पोटातील अवयव निकामी होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली. त्याच्या पोटात रबरी नळी टाकून त्यातील, अ‍ॅसिड बाहेर काढण्यात पथकाला यश आले. अ‍ॅसिडमुळे अन्न नलिका व त्याच्या उगमस्थानापासून इजा झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. परंतु, उपचारास आणखी दोन तास उशीर झाला असता, तर त्याची अन्न नलिका कायमस्वरूपी जायबंदी झाली असती. अ‍ॅसिड पोटात गेलेल्या रु ग्णांना भविष्यात आतड्यांचा कर्करोगाची शक्यता असते. त्यामुळे दर तीन वर्षांनी रु ग्णाला एन्डोस्कोपी व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो, असे डॉ. वर्मा यांनी सांगितले. सध्या राजवीरची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दर १५ दिवसांनी मात्र त्याच्या पोटाची तपासणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

महत्त्वाचे अवयव होऊ शकतात जायबंदी-कीटनाशके, उंदरांना मारायचे विष, ब्लिचिंग पावडर, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, पैराफिन (रॉकेल- तेल) अशी तत्सम द्रव्ये उपयोगात येणाऱ्या घरातील कोणत्याही भांड्यांमध्ये अथवा बाटलीत ठेऊ नये. अशा वस्तू व पदार्थ ठेवलेल्या भांड्यांवर स्प्ष्टपणे खूण करून ते बंदिस्त ठेवावेत. विषारी द्रव्ये पोटात गेल्यास मेंदू निकामी होणे, अंधत्व येणे, अर्धा भाग निकामी होणे किंवा आयुष्यभरासाठी महत्त्वाचे अवयव जायबंदी होण्याची शक्यता असते.