शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

‘पतंजली’च्या प्रकल्पाविरोधात जनहित याचिका

By admin | Updated: April 4, 2017 05:54 IST

गेल्यावर्षी राज्य सरकारने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक लि.ला नागपूर येथे ६०० एकर वनजमीन दिली.

मुंबई : गेल्यावर्षी राज्य सरकारने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक लि.ला नागपूर येथे ६०० एकर वनजमीन दिली. मात्र राज्य सरकारच्या या व्यवहाराला आक्षेप घेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारने अगदी किरकोळ किंमतीत हा भूखंड ‘पतंजली’ ला दिल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार नेत्यांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संजय निरुपम यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.नागपूर येथील मिहान भागातील ६०० एकर वन जमीन बाबा रामदेव यांच्या मेसर्स पतंजली आयुर्वेदिक लि. दिली आहे. ही जमीन विक्रीकरण्यापूर्वी निविदा काढल्या असल्या तरी ती केवळ एक औपचारिकता असल्याचे निरुपम यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार, जमीन लिलावात काढताना प्रत्येक एकरसाठी ३६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. मात्र ‘पतंजली’ला प्रत्येक एकरसाठी २५ लाख रुपये द्यावे लागले. प्रत्येक एकरसाठी एक कोटी रुपये, असा दर या जमिनीसाठी असतानाही राज्य सरकारने काहीही कारण नसताना पतंजलीला ही जमीन अगदी सवलतीच्या दरात दिली.या किमतीवर संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेतली. मात्र त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे चौकशी करण्यासाठी पथक नेमावे. शिवाय, ही सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ‘पतंजली’ला जमिनीचा ताबा न देण्याची अंतरिम मागणी केली आहे. (प्रतिनिधी)