शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

इन्व्हेस्टमेंट फंडाची तरतूद आशादायी : माशेलकर

By admin | Updated: July 10, 2014 23:07 IST

केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प चांगला आहे. यामध्ये पायाभूत सोयी-सुविधा, नोकरी आदी महत्वाच्या गोष्टींवर अधिक भर दिला आहे.

केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प चांगला आहे. यामध्ये पायाभूत सोयी-सुविधा, नोकरी आदी महत्वाच्या गोष्टींवर अधिक भर दिला आहे. यादृष्टिकानोतून हा अर्थसंकल्प छान वाटला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रच्या विकासासाठी नॅनो टेकAॉलॉजी व बायो टेकAॉलॉजीवर बराच जोर देण्यात आला आहे. याच्या विकासासाठी मोठया गुंतवणूकीचा विचार करण्यात आला आहे, ही चांगली गोष्ट आहे. याचबरोबर टेकAॉलॉजी इन्व्हेसमेंट फंड निर्माण करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. ही चांगली सुरूवात आहे, असे म्हणावे लागेल. 
ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर होणो आवश्यक असते. हा विचार ग्राहय धरत अर्थसंकल्पात यासाठी इन्क्युबेटर एक्सलेटर वर भर देण्यात आला आहे. यामुळे शास्त्रज्ञांकडून केले जाणारे संशोधन आता प्रत्यक्षात व्यवहारात येण्यासाठी चालना मिळेल. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे अॅग्री रिसर्च होणो महत्वाचे आहे. मात्र आतार्पयत याकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते. आता त्यावर जोर दिला जाणार असून त्यासाठी नव्या इन्स्टिटयूट स्थापन्यात येतील, असे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. ही चांगली गोष्ट आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रचा विचार करताना इनोव्हेशन, शिक्षण यांचाही विचार करणो क्रमप्राप्त होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या सर्वाचा एकत्रित विचार करून त्यांना जोडणारे निर्णय घेण्यात आले आहेत. आज आपल्या देशातील उच्च शिक्षणाचा स्तर वाढत आहे आणि उच्च शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याची संख्या वाढत आहे, हे ग्रॉस एनरॉलमेंड रेशोवरून दिसून येत आहे. सध्या हा रेशो 2क् टक्क्यांवर आला आहे. काही वर्षापूर्वी हा 5 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान होता. तो वाढल्यामुळे उच्च शिक्षणाचा स्तर वाढविण्याचे आणि तो उच्च दर्जाचा करण्याचे आव्हान आहे. यासाठी 5 आयआयटी, 5 आयआयएम आणि 12 वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. ही उल्लेखनिय गोष्ट आहे. यामुळे उच्च शिक्षणाला चालना मिळण्याचा मार्ग सोप्पा झाला आहे. 
 
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रचा विस्तार करण्याचा सरकारचा निर्णय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिसून येत आहे. प्रत्यक्षात एवढी अपेक्षा नव्हती. अपेक्षा जेवढया करतो तेवढया त्या वाढतच जातात. पण यंदाच्या अर्थसंकल्पात खर्च किती केला आहे, हे पाहण्यापेक्षा तो कशावर करण्यात आला आह़े कशा प्रकारे करण्यात येणार आहे, हे पाहणो महत्वाचे आहे. यामुळे यंदाचा अर्थसंकल्प चांगले निर्णय घेऊन आलेला आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ