शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

ऊसदरप्रश्नी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी

By admin | Updated: January 14, 2015 04:03 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव देण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे

लोणी (अहमदनगर) : ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपीप्रमाणे भाव देण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे शिष्टमंडळ नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना तोडफोड करून जनतेचे लक्ष विचलीत करून प्रश्नाचे गांभीर्य कमी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मंगळवारी सकाळी विखे यांनी ऊसदराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. चर्चेचा तपशील देताना ते म्हणाले, की या प्रश्नावर सरकारने पॅकेज जाहीर करावे आणि साखर कारखान्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळाला पाहिजे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी. सवलती मिळाल्यामुळे सहकारी साखर कारखाने चांगला भाव देण्यासाठी पुढाकार घेऊ शकले. मात्र आज सत्तेतील भागीदार पक्ष सरकारवर दबाव आणण्याऐवजी कारखान्यांवर कारवाईची आश्चर्यकारक भूमिका घेताना दिसतात. सत्तेतील भागीदारांनी पंढरपूर ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला असता तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते, अशी टीकाही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर केली. (प्रतिनिधी)