शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत सिद्ध करा नंतरच सरकार चालवा

By admin | Updated: November 24, 2014 01:14 IST

राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

फडणवीस सरकारवर चव्हाण यांचे टीकास्त्र नागपूर : राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. फडणवीस सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे, नंतरच सरकार चालवावे अशी मागणी करीत हिवाळी अधिवेशनात काँग्रेस राज्य सरकारला घाम फोडणार असल्याचे संकेत चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिले. केवळ आवाजी मतदानाने सत्तेत आलेले राज्यातील भाजपचे सरकार घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले होते. याचा दाखला देत चव्हाण म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपने सभागृहाची दिशाभूल केली. यावेळी विधानसभेतील कामकाजाचा क्रम अध्यक्षांनी सभागृहाला विश्वासात न घेता बदलला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीचे ‘ व्हिडिओ क्लिपिंग’ का उपलब्ध करून दिले जात नाही, असा सवाल चव्हाण यांनी यावेळी केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना १५ दिवसांत बहमुत सिद्ध करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ, शिवसेना आणि काँग्रेस विरोधात असताना बहुमतासाठी लागणारा १४५ चा आकडा सरकारजवळ नव्हता, त्यामुळे गोंधळ निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन हेतूपुरस्सर करण्यात आल्याचे सांगत हिवाळी अधिवेशनात आणखी काही आमदार निलंबित करून कृत्रिम बहुमताचा आकडा गाठण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली. विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने केलेल्या कृतीची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे. मात्र त्यावर काहीएक झाले नसल्याने या प्रश्नावर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रपतींची वेळ मागितल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विरोेधी पक्षात कोण ? विरोेधी पक्षात कोण आणि सरकारसोबत कोण हे राज्यातील जनतेला कळण्यासाठी आधी सरकारने मतदानाने बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीने सरकारला टेकू दिला आहे तर शिवसेना सत्तेच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची सक्षम भूमिका वठवेल, असे चव्हाण यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले. फडणवीस-गडकरी यांच्यात विसंगती राज्यात महिनाभरात एलबीटी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. मात्र राज्य मंत्रिमंडळाने एलबीटी रद्द करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे एलबीटीसंदर्भात दोन्ही नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यात विसंगती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जवखेडे हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा पाथर्डी येथील जवखेडे हत्याकांडाचा तपास संथगतीने सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस आतापर्यंत जवखेडे येथे गेले नाहीत. तपासाला गती देण्यासाठी या प्रकरणाची चौैकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी चव्हाण आणि ठाकरे यांनी यावेळी केली.