शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘डाळी दर नियंत्रण’ कायदा लांबणीवर, केंद्राने नोंदवला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 10:14 IST

राज्यातील 'डाळी दर नियंत्रण'संदर्भातील प्रस्तावित कायदा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 'डाळी दर नियंत्रण' कायद्यातील काही तरतुदींवर केंद्र सरकारने आक्षेप घेत तो राज्य सरकारकडे परत पाठवला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि 17 - राज्यातील 'डाळी दर नियंत्रण'संदर्भातील प्रस्तावित कायदा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 'डाळी दर नियंत्रण' कायद्यातील काही तरतुदींवर केंद्र सरकारने आक्षेप घेत तो राज्य सरकारकडे परत पाठवला आहे. त्यामुळे ऐन सणांच्या तोंडावर चणा डाळ, उडीद डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश आले आहे. तूर, उडीद डाळीच्या दरांनी 200 ते 250 रुपये किंमत गाठल्याने गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशानात राज्य सरकारने हा कायदा मंजूर केला होता. यानंतर तो परवानगीसाठी केंद्र सरकारला पाठवण्यात आला. 
 
ज्या डाळीचा दर वाढेल, किरकोळ बाजारातील त्याचा कमाल विक्रीदर राज्य सरकार निश्चित करेल आणि त्यापेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तीन महिने ते एक वर्षे तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृह, अन्न आणि नागरीपुरवठा खात्यांच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींची मंजुरी अपेक्षित होती. मात्र शिक्षेच्या तरतुदीसह चार-पाच बाबींवर आक्षेत घेत त्या दुरुस्त करण्यासाठी केंद्र सरकारने हा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडे पाठवला आहे. विधेयकातील आक्षेप घेतलेल्या तरतुदी दुरुस्त झाल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान, अच्छे दिनचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतच असल्याचे दिसत आहे.