शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: June 10, 2016 05:22 IST

देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवण्याची सक्ती सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र राज्यातील सर्व कमर्शियल वाहनांना स्पीड गर्व्हनर बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याची माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिलचे सदस्य डॉ. कमलजित सोय यांनी दिली. देशभरात दोन कोटी कमर्शियल वाहने असून महाराष्ट्रात त्यांची संख्या जवळपास २० लाख आहे. वाहन चालक किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि त्याला वाहतुकीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र कमर्शियल वाहनांवर असलेले चालक हे दहावी पासही नसतात आणि त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालनही काटेकोरपणे केले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यानेच स्पीड गर्व्हनर बसविणे आवश्यक आहे, असे मत सोय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना स्पीड गर्व्हनर बसविणे बंधनकारक केले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. काही ठराविक राज्ये सोडल्यास इतर राज्यांनी वेग नियंत्रक बसविणे बंधनकारकही केले नसल्याचे सोय यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >देशभरात रोज होतात २० हजार अपघात देशात दरवर्षीय पाच लाख तर रोज २0 हजार अपघात होतात. दहशतवादी हल्ल्यांत १५ वर्षांत ३५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र १५ वर्षांत रस्ते अपघातांत १ लाख ५0 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात १८ कोटी वाहने असून २८ कोटी लायसन्स आहेत.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २0१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात ४४ हजार ३८२ रस्ते अपघात झाल्याचे समोर आले आहे. १३ हजार ५२९ जणांनी आपले प्राण गमावले, तर ४३ हजार ६६८ जण जखमी झाले. त्यामुळे वेग नियंत्रकांची गरज आहे.