शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

जलपरीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा प्रस्ताव

By admin | Updated: July 27, 2016 20:07 IST

लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही.

रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मागणी : आॅगस्ट अखेरपर्यंत सेवा द्या लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत जलपरीची सेवा कायम ठेवावी, असा प्रस्ताव महानगर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे.

लातूर शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने १२ एप्रिलपासून लातूर शहराला रेल्वेव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या अर्धा पावसाळा संपला तरी मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. शिवाय, जिल्ह्यातील प्रकल्पही कोरडेठाक आहेत. सध्याही पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची सेवा बंद करण्यात येऊ नये. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही आणि प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जलपरीची सेवा सुरू ठेवावी, असे लातूर महानगर पालिकेने सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. परंतू या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर अद्याप आले नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा साठा झालेला नाही. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, मांजरा प्रकल्प कोरडा आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याशिवाय, लातूरकरांना नळाव्दारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे जलपरीची सेवा आवश्यक असल्याचे पत्र रेल्वे पशासनाला पाठविण्यात आले आहे.

मुदतवाढ मिळणार ; रेल्वे प्रशासन सकारात्मक...रेल्वेकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुदतवाढ मिळेल. जोपर्यंत पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत रेल्वेची सेवा राहणार आहे. तसे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे बोलणे झाले असून, प्रस्तावाला मुदवाढ देण्यासाठी रेल्वे प्रशासन सकारत्मक असल्याचे लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कावळे यांनी सांगितले.