शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शिक्षणानेच प्रगती घडेल

By admin | Updated: September 20, 2016 01:40 IST

मराठवाड्याची प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

कोथरूड : मराठवाड्याची प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. मराठवाडा नागरी विकास संघ आयोजित मराठवाडा मुक्तिदिन स्मृती समारोहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पवार बोलत होते. संजय जाधव, खासदार रवींंद्र गायकवाड, भाऊसाहेब जाधव, विनायक निम्हण व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी मराठवाडा भूषण पुरस्कार पशू व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना, तर मराठवाडा रत्न पुरस्कार शेतकरी नेते पाशा पटेल, पत्रकार गजेंद्र बडे, उद्योजक शरद तांदळे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल दीपक नागरगोजे, तबलावादक अशोक मोरे यांना देण्यात आला.पवार म्हणाले, की मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचे विस्मरण होता कामा नये. मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का घालवण्यासाठी समाज शिक्षित करणे गरजेचे आहे. जलसंधारणाची कामे होणे गरजेचे आहे. आरक्षण हे सुधारण्याची संधी म्हणून आले, हे विसरता कामा नये. नाना वाघमारे, दिनकर चौधरी, शंकर वसेकर, चंद्रसेन स्वामी यांनी संयोजन केले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर चौधरी यांनी आभार मानले. मूळचे मराठवाड्यातले पण व्यवसाय, शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या मराठवाडावासीयांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)