शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कपाशीचा पेरा घटला तरीही उत्पादन वाढणार

By admin | Updated: October 4, 2015 03:25 IST

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर्षी कपाशीचे लागवड क्षेत्र (पेरा) कमी झाले असले तरी कापसाचे उत्पादन मात्र गतवर्षी एवढेच भरघोस होणार आहे. कारण कपाशीच्या पिकाची

यवतमाळ : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर्षी कपाशीचे लागवड क्षेत्र (पेरा) कमी झाले असले तरी कापसाचे उत्पादन मात्र गतवर्षी एवढेच भरघोस होणार आहे. कारण कपाशीच्या पिकाची स्थिती उत्तम आहे. नोव्हेंबर ते जानेवारी पाऊस झाल्यास ही पीक परिस्थिती आणखी सुधारणार असल्याचे सांगितले जाते.गेली काही वर्ष कपाशीचे क्षेत्र स्थिर होते. नंतर त्यात घट झाली. यावर्षी कपाशीचे लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत आणखी कमी झाले. गुजरातमध्ये पाऊस कमी झाल्याने पाच ते दहा टक्के तर कर्नाटकात ३0 ते ४0 टक्के पेरा कमी झाला आहे. मध्यप्रदेशात गतवर्षी एवढेच लागवड क्षेत्र आहे. आंध्रा-तेलंगणामध्ये पेरा कायम आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये हे क्षेत्र दहा टक्के घटले आहे. महाराष्ट्रातसुद्धा कपाशीच्या लागवडीत घट झाली. सर्वत्र हे क्षेत्र घटले असले, तरी कपाशीचे उत्पादन मात्र आवश्यकतेच्यावेळी आलेल्या समाधानकारक पावसामुळे वाढणार आहे. विदर्भात कपाशीची सर्वात चांगली स्थिती सांगितली जाते. मराठवाड्यात अलीकडे आलेल्या पावसामुळे ४0 ते ५0 टक्के पिकांना जीवदान मिळाले. शेजारच्या आंध्रा व तेलंगणातसुद्धा कपाशीचे जोरदार पीक होईल. कपाशीची स्थिती पाहता यावर्षी देशात ३ कोटी ८0 लाख रुईगाठी तयार होतील, एवढा कापूस पिकणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दाव्याने सांगितले जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये हलकासा पाऊस आला तरी कापसाचे उत्पादन १0 ते २0 लाख गाठींनी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी फरदळ कापूस फुटला नाही.