शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला जिल्हय़ात सेंद्रिय केळीचे उत्पादन!

By admin | Updated: December 15, 2014 23:35 IST

राज्यातील केळी उत्पादकांना ठरणार प्रेरणादायक.

राजरत्न सिरसाट/अकोला : फळ विकत घेणे ऐकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे..घरात कोणी आजारी पडले तर फळ दिसायचे. आता सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढल्यामुळे घरोघरी फळांचा वापर वाढला आहे; पण या फळात रसायन, विषारी कीटकनाशकांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचे दुरगामी परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी अकोला जिल्हय़ात सेंद्रिय (बायोडायनॅमिक)केळी उत्पादनावर भर दिला जात असून, राज्यातील केळी उत्पादकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. जिल्हय़ातील बाश्रीटाकळी येथील शेतकरी राजू इनामदार व विलास महल्ले यांनी प्रत्येकी दोन एकरावर (बायोडायनॅमिक) सेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादनाला सुरुवात केली आहे. या केळीची नैसर्गिक चकाकी आणि गोडवा बघता,या केळीला प्रचंड मागणी वाढल्याने त्यांना या दोन एकरात जवळपास पाच लाख पन्नास हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.यावर्षी या शेतकर्‍यांनी पंचाग तिथीनुसार दोन एकरात ग्रँड-९ या जातीच्या केळीची बायोडायनॅमिक पद्धतीने लागवड केली आहे.यासाठी त्यांनी जीवामृत आणि तरळ खाद्य वापरू न शेतावरच बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार केले आहे. या खताचा १0 ते १२ दिवसानंतर ठिबक पद्धतीने ( ड्रेचिंग)हे खत दिले जाते. रोग, किडीचे नियंत्रण करण्यासाठी याच किडीचा वापर केला जात आहे. सेंद्रिय पद्धतीने फळ उत्पादन केल्याने नागरिकांना विषमुक्त केळी तर उपलब्ध झालीच शिवाय उत्पन्नही भरघोस मिळाल्याने जिल्हय़ातील नव्हे तर विदर्भातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेटी देत आहेत. *केळी घडाचे वजन ३८ किलोसेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादन घेतल्याने केळीच्या घडाचे वजन ३८ किलो वाढले आहे. केळी लागवडीसाठी इनामदार व महल्ले यांनी दोन एकरात ३५00 टिश्यू कल्चर केळी लागवड केली.यासाठी त्यांना प्रतिनग १३ रुपये द्यावे लागले.इतर मशागत कपोस्ट कल्चर, दिव्यशक्ती ऊर्जा, इत्यादी मिळून प्रतिझाड केवळ ३९ रुपये मिळून दोन एकरला १,३६000 हजार रुपये खर्च झाला.*दोन एकरात सहा लाख ६५ हजारांचे उत्पन्न या दोन या शेतकर्‍यांनी प्रती झाड १९0 रुपये या प्रमाणे त्यांना ६ लाख ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.म्हणजेच २ लाख २४ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला.या सेंद्रिय केळीची माहिती घेण्यासाठी बाश्रीटाकळी येथे खान्देशसह राज्यातील शेतकरी भेटी देत आहेत.