शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

गणेशोत्सवातील निर्माल्यापासून होतेय खत निर्मिती

By admin | Updated: September 21, 2016 04:05 IST

निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थाने हाती घेतले आहे.

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- गणेशोत्सवात तयार झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थाने हाती घेतले आहे. त्यासाठी प्रतिष्ठानने १० दिवसांत कल्याणमधून १० टन निर्माल्य तर गणेश मंदिराने १० टेम्पो जैव कचरा गोळा केला. भक्ती मार्गाने पर्यावरण संरक्षण करता येते, असा संदेश या संस्थांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी त्याचे अनुकरण केल्यास कल्याण-डोंंबिवलीतील कचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, अशा आशावाद त्यांनी यानिमित्त व्यक्त केला आहे.प्रतिष्ठानचे कल्याण सदस्य अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले की, कल्याणमधील गणेशघाट येथे दीड दिवसाच्या विसर्जनापासून निर्माल्य गोळा करण्यासाठी २०० सेवेकरी नेमले होते. त्यांनी जवळपास १० टन निर्माल्य गोळा केले. त्यातून केवळ जैव कचरा घेतला. त्यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ््या केल्या. लाल चौकी स्मशानभूमीजवळ १५ फूट रुंद, ३० फूट लांब आणि पाच फूट खोल, असा खड्डा खणला. त्यात दररोज जमा झालेले निर्माल्य टाकले. दर दिवशी त्यावर शेणाचा थर व पाणी टाकले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी चांगले ढवळून घेतले. त्यातून खत निर्माण होईल. प्रतिष्ठाने स्वखर्चाने हा उपक्रम राबवला आहे. त्याची प्रेरणा व संकल्पना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांची होती. या उपक्रमातून कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी जागृती करण्यात आली.’ >गणेश मंदिर संस्थानने केली जागृतीडोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानातर्फे निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाते. मात्र यंदा प्रथमच गणेशोत्सवात संस्थाने त्याची जागृती केली. नेहरू मैदान, पंचायत बावडी, नांदिवली रोड, प्रगती कॉलेज, एमआयडीसी आणि गणेश मंदिर संस्थान या विसर्ज स्थळांहून निर्माल्य गोळा केले. १० दिवसांत १० टेम्पो भरले इतके निर्माल्य गोळा झाले. त्यातून प्लॅस्टिक वेगळे केले. जैव कचऱ्यापैकी सुका जैव कचरा बारीक करण्यासाठी मंदिराकडे क्रश मशीन आहे. एमआयडीसीतील जागेत या कचऱ्यापासून खत तयार केले जाते.खत तयार होण्यासाठी साधारणात: तीन आठवडे लागतात. शेण व पाणी टाकून थर लावला जातो. ते दोन तीन दिवसांनी ढवळून घेतले जाते. तयार झालेले खत मंदिर प्रति किलो १० रुपयाने विकते. देवाला वाहिलेले फूल पुन्हा देवाच्या चरणी वाहण्यासाठी हा उपक्रम आहे. >खताचा वापर झाडांसाठीकल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेने उपक्रमास सहकार्य केल्यास हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू करता येऊ शकतो, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. या उपक्रमात तयार होणाऱ्या खताचा वापर प्रतिष्ठानने नेवाळी, टिटवाळा, पडघा, मलंग रोड, फडके रोड, गणेश घाट येथे लावलेल्या झाडांसाठी केला जाणार आहे. >पर्यारण संरक्षणासाठी हा उपक्रम राबविल्याचे मंदिराचे पदाधिकारी प्रवीण दुधे यांनी सांगितले. गणेश मंदिर संस्थानचा आदर्श केडीएमसीने घेतल्यास स्वच्छ व सुंदर डोंबिवली लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते, असा विश्वास मंदिर संस्थानला आहे. त्यात संस्थानचा सक्रिया सहभाग असेल, अशी हमीही दुधे यांनी दिली.