शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षकांनी जाणून घेतल्या कैद्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 05:09 IST

वर्षानुवर्षे तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी केला

गणेश वासनिक, अमरावतीवर्षानुवर्षे तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी केला. विविध सामाजिक संघटना आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने सोमवारी अमरावती कारागृहात बंदी सुधार अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. अधीक्षक ढोले यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे कैद्यांना त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याची संधी मिळत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी पार पडलेल्या कार्यशाळेत कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पाच विषयांवर बोलते केले. त्यात बंदी समस्या, कारागृह स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक रुग्ण असलेल्या कैद्यांचे सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील तसेच वैद्यकीय उपचार या विषयांचा समावेश होता. या अभियानात सुमारे ६०० कैद्यांनी सहभाग नोंदविला.कारागृहातील खुल्या पटांगणात कैद्यांना एकत्र आणण्यात आले आणि मनातील व्यथा नि:संकोचपणे मांडा, असे आवाहन ढोले यांनी केले. या वेळी बहुतांश कैद्यांनी नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी महिला-बालकल्याण अधिकारी चवरे, वऱ्हाड संस्थेचे नागदिवे, प्रमोद मेश्राम, अवेअरनेस संस्थेचे अमित शहाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, आदींची उपस्थिती होती.