शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच सत्ता गमावली

By admin | Updated: September 19, 2016 04:48 IST

आमच्या पाठिंब्यावर ज्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते, त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे सत्ता गमवावी लागली

सातारा : आमच्या पाठिंब्यावर ज्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते, त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे सत्ता गमवावी लागली,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पराभवावरून कलगीतुरा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी याची सुरुवात केली. निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेसच्या माथी मारून ते मोकळे झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’मधून जशाच तसे उत्तर दिले.अजित पवार हे रविवारी सातारा जिल्ह्यात आले होते. शिवथर, पळशी, आणि भोसे येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. यावेळी पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले, आमच्या पाठिंब्यामुळे जे मुख्यमंत्री बनले त्यांच्याच चुकीच्या धोरणाचा फटका आम्हाला बसला. (प्रतिनिधी)>मराठा आरक्षणासाठी मोर्चा हवाच...सध्याच्या सरकारकडून युवकांना रोजगार मिळत नाही. अंगणवाडी सेविकांच्या मागणीला तर वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत, असे सांगून पवार म्हणाले, आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे शांततेत मोर्चे निघत असतील तर निघू देत. कोणी विरोध करण्याचे कारण नाही. मराठा समाजाबरोबर धनगर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाची मागणी करत महादेव जानकर मंत्री झाले, पण सरकार दखल घेत नाही, असेही ते म्हणाले.