शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांचा एक दिवस कुटुंबासोबत !

By admin | Updated: July 9, 2016 04:02 IST

कधी किरकोळ रागामधून, कधी ठरवून, कधी अजाणतेपणी तर कधी नाईलाज म्हणून हातून घडलेला गुन्हा भली मोठी शिक्षा भोगायला लावतो. उभं तारुण्य कारागृहांच्या भिंतीआड सरून जातं.

- लक्ष्मण मोरे, पुणे

कधी किरकोळ रागामधून, कधी ठरवून, कधी अजाणतेपणी तर कधी नाईलाज म्हणून हातून घडलेला गुन्हा भली मोठी शिक्षा भोगायला लावतो. उभं तारुण्य कारागृहांच्या भिंतीआड सरून जातं. आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी-मुले सर्व काही दुरावते. परिवारापासून दूर राहण्याचं दु:ख उराशी बाळगत कैदी एकेक दिवस मोजत आयुष्य जगत असतात. या बंदी बांधवांच्या आयुष्यामध्ये बदलाची पहाट आणण्यासाठी कारागृह विभाग गेल्या काही महिन्यांपासून विविध उपक्रम राबवीत आहे. त्यांच्यातील परिवर्तन प्रक्रियेचा एक भाग म्हणून बंदीजनांना लवकरच एक संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालविण्याची संधी मिळणार आहे. एरवी जाळीआडून एकमेकांशी बोलणारे नातेवाईक या कैद्यांना प्रत्यक्ष समोरासमोर भेटून एकत्र जेवण घेऊ शकणार आहेत. आपल्या मुलाबाळांसोबत काही तास का होईना; मात्र खेळू बागडू शकणार आहेत. राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक तथा अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेमधून लवकरच हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी कारागृह विभागाला पुण्यातील काही सामाजिक संस्था यथाशक्ती मदत करीत आहेत. डॉ. मिलिंद भोई यांचे शंकरराव भोई प्रतिष्ठान, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांचे आदर्श मित्रमंडळ यांच्या सहकार्याने येरवडा कारागृहात कैद्यांसाठी गेल्या वर्षभरापासून ‘प्रेरणापथ’ ही व्याख्यानमाला चालविली जात आहे. कैद्यांसमोर प्रख्यात शास्त्रज्ञ, वकील, अभ्यासक, लेखक, उद्योजक यांची भाषणे झाली आहेत. कैद्यांनी या कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनामधून बोध घेऊन आयुष्य सुधारावे, अशी संकल्पना त्यामागे आहे. कैद्यांना सुधारण्याची संधी देणे आणि समाजात त्यांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. शेवटी एखाद्या चुकीसाठी आयुष्यभर कारागृहाच्या भिंतीआड गेलेली ‘माणसं’च आहेत. कारागृहातले दैनंदिन व्यवहार, कामकाज आणि शिक्षा भोगताना अनेक कैदी पश्चात्तापामुळे ढसाढसा रडत असतात. त्यांना कुटुंबाला भेटायची इच्छा होत राहते. गर्दीमध्ये राहत असले तरी सर्व जण तसे ‘एकटे’च असतात. कुटुंबीय भेटायला आले तरी मध्ये जाळी असते. दूरूनच मोजके बोलावे लागते. वेळेच्या मर्यादेमुळे एकमेकांना नीट भेटता आणि बोलताही येत नाही.शिक्षा भोगायला येताना घरामध्ये लहानग्याला सोडून आलेला कैदी घरी परत जातो तेव्हा मुले मोठी झालेली असतात. त्यांच्यामध्ये एक अदृश्य असे अंतर पडलेले असते. आपल्या परिवाराला भेटण्याची कैद्यांची इच्छा आता पूर्णत्वास येणार आहे. दर महिन्याला काही कैदी निवडून त्यांची थेट परिवारासोबतच भेट घालून देण्यात येणार आहे. शिक्षा भोगत असताना चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांच्या पत्नी, मुले यांना एक दिवस भेटण्याची योजना कारागृह विभाग सुरू करणार आहे. येत्या आठवडाभरात तब्बल २०० कैद्यांना त्यांच्या पत्नी व मुलांना भेटवण्यात येणार आहे. हे कैदी त्यांच्या घरचे जेवण परिवारासोबत बसून जेवतील. सर्व जणांना एकाच मोठ्या हॉलमध्ये एकत्र करून तेथेच सर्व जण भेटतील. बराच काळ दूर राहिलेल्या ‘माणसांची’ भेट यानिमित्ताने घडवून आणण्याच्या प्रयत्नामागे कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी आणि त्यांचे मतपरिवर्तन व्हावे, हा हेतू आहे. -