शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांनी बनविलेल्या ‘एलईडी’ने कारागृहे उजळली

By admin | Updated: October 13, 2016 05:21 IST

मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांमुळे राज्यातील निम्मी कारगृहे उजळून निघाली आहेत. ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही हे दिवे सरस असल्याने

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांमुळे राज्यातील निम्मी कारगृहे उजळून निघाली आहेत. ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही हे दिवे सरस असल्याने मागणी वाढत असून, आता दुसरे युनिटही सुरू करण्यात आले. राज्यातील कारागृहांमध्ये बंदीसुधारणा व पुनर्वसनांंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर वर्धा येथील ‘एमगिरी’च्या पुढाकाराने अमरावती कारागृहात दीड वर्षांपूर्वी एलईडी दिवे निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रारंभी १० बंदीजनांनी एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. बंदीजनांच्या हातून तयार होणारे हे दिवे ब्रँडेड कंपन्यांना मागे टाकणारे ठरले. परिणामी, राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी या दिव्यांचा पुरवठा राज्यभरातील कारागृहांत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यभरातील निम्मी कारागृहे इथल्या कैद्यांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांनी उजळली आहेत. या एलईडी दिव्यांना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, आता दुसरे युनिट निर्माण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदीजनांनी तयार केलेले विविध साहित्य, वस्तूंचे प्रदर्शन १३ आॅक्टोबर थेट मंत्रालयात भरविले आहे. त्यामध्ये येथील एलईडी दिवेही ठेवले जाणार आहेत. (प्रतिनिधी)