शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी

By admin | Updated: April 2, 2015 05:07 IST

राज्यातील मध्यवर्ती कारागृहासह सर्व लहान-मोठे कारागृह सध्या कच्च्या व पक्या कैद्यांनी तुडुंब भरून गेले आहेत. बंद्यांना ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा जवळपास १० हजार जण राहत

जमीर काझी, मुंबईराज्यातील मध्यवर्ती कारागृहासह सर्व लहान-मोठे कारागृह सध्या कच्च्या व पक्या कैद्यांनी तुडुंब भरून गेले आहेत. बंद्यांना ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा जवळपास १० हजार जण राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याउलट जेलमधील सुरक्षा आणि कैद्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मंजूर असलेल्यांपैकी जवळपास २५ टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या दोन्ही समस्यांचा परिणाम कारागृहातील सुरक्षा यंत्रणेवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रक्षकांवरील कामाच्या वाढत्या ताणाबरोबर कैद्यांच्या पलायनाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तुरुंग प्रशासनाच्या मूलभूत सुविधांबाबत गृह विभागाचे होत असलेले दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृहातून काल पाच कैद्यांनी पलायन केले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रकारच्या कारागृहांतील कैद्यांची क्षमता आणि प्रत्यक्षातील संख्या, त्याचप्रमाणे जेलची सुरक्षा, प्रशिक्षणासाठी मंजूर व कार्यरत पदांचा आढावा घेतला असता मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून १५ मार्चपर्यंतची आकडेवारी ‘लोकमत’च्या हाती लागली असून, त्यातील माहिती धक्कादायक आहे. सध्या राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. एकूण क्षमता १४ हजार ८४१ असताना या दोन्हींची संख्या १८ हजार ९२० बंद्यांना ठेवण्यात आलेले आहे. १५ जिल्हा वर्ग-१ कारागृहे असून त्या ठिकाणची क्षमता ५,६५९ असताना प्रत्यक्षात ४,७०५ बंदी आहेत. तर १७ ब वर्ग कारागृहाची क्षमता ६४१ असताना या ठिकाणी ३,५२४ बंद्यांना ठेवण्यात आलेले आहे.