शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

परवानगी नसलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन !

By admin | Updated: July 20, 2016 00:28 IST

आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या कामास झोपडपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यताच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

पुणे : स्मार्ट सिटी योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या औंधच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या कामास झोपडपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यताच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी प्रत्येक बाबीची कसून तपासणी केली जात असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘स्मार्ट सिटी’अंतर्गत एकूण १४ प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर यातील बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या प्रकल्पासाठी तर मान्यताही घेतली नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी त्याबाबतची कागदपत्रे उजेडात आणली आहेत.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध येथील सव्वादोन एकर क्षेत्रावर असलेल्या आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचा प्रकल्प आयुक्तांनी मांडला होता. झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत हा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या योजनेला मान्यता देण्यात यावी, असे पत्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ७ जून रोजी पाठविले होते. मात्र, आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा कोणताही प्रस्ताव एसआरएकडे आला नसल्याचे पालिकेला २० जून रोजी कळविण्यात आले. तरीही पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे संजय बालगुडे यांनी सांगितले.आंबेडकर वसाहतीमध्ये एसआरए प्रकल्प राबविण्याबाबत २१ जून रोजी नागरिकांची बैठक घेण्यात आली होती. मात्र ती पावसामुळे होऊ शकली नाही. त्यानंतर २३ जून रोजी आयोजित केलेली बैठकही झाली नाही. एसआरए प्रकल्प एखाद्या ठिकाणी राबविण्यासाठी तेथील नागरिकांचे संमतीपत्र आवश्यक असते. त्या संमतीपत्रासह एसआरए प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या कोणत्याही प्रक्रिया न पार पाडता आयुक्तांनी या प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते रिमोटद्वारे बटन दाबून शुभारंभ केला आहे. >काम काहीच नाही; पण उद्घाटनाचे मार्केटिंगस्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते २५ जून रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम पुण्यात घ्यायचा असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना केवळ ८ दिवस अगोदर कळविण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेच्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नव्हती. कोणत्याही कामाचे टेंडर काढण्यात आले नव्हते. त्यामुळे अवघ्या ८ दिवसांत उद्घाटन कोणत्या प्रकल्पांचे करायचे, असा प्रश्न आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर पडला. त्यामुळे बहुतांश अर्धवट प्रकल्पांचेच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेचे काम काहीच नाही; पण उद्घाटने करून त्याचे देशभर मार्केटिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.>प्रकल्पांची माहिती मागविलीपंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलेले बहुतांश प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्याने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी या सर्व प्रकल्पांच्या कागदपत्रांची माहिती मागविली आहे. या प्रकल्पांना मान्यता कधी घेतली, त्याचे टेंडर कधी काढले, काम सध्या कुठल्या टप्प्यात आहे, याची माहिती मागविली आहे.>औंध येथील बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील एसआरए प्रोजेक्ट हा एक चांगला प्रकल्प असेल. त्याचे नोटिफिकेशन एसआरएने प्रसिध्द केले आहे. या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे त्याबाबत करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत.- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त