शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

परवानगी नसलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन !

By admin | Updated: July 20, 2016 00:28 IST

आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या कामास झोपडपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यताच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

पुणे : स्मार्ट सिटी योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या औंधच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या कामास झोपडपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यताच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी प्रत्येक बाबीची कसून तपासणी केली जात असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘स्मार्ट सिटी’अंतर्गत एकूण १४ प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर यातील बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या प्रकल्पासाठी तर मान्यताही घेतली नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी त्याबाबतची कागदपत्रे उजेडात आणली आहेत.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध येथील सव्वादोन एकर क्षेत्रावर असलेल्या आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचा प्रकल्प आयुक्तांनी मांडला होता. झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत हा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या योजनेला मान्यता देण्यात यावी, असे पत्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ७ जून रोजी पाठविले होते. मात्र, आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा कोणताही प्रस्ताव एसआरएकडे आला नसल्याचे पालिकेला २० जून रोजी कळविण्यात आले. तरीही पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे संजय बालगुडे यांनी सांगितले.आंबेडकर वसाहतीमध्ये एसआरए प्रकल्प राबविण्याबाबत २१ जून रोजी नागरिकांची बैठक घेण्यात आली होती. मात्र ती पावसामुळे होऊ शकली नाही. त्यानंतर २३ जून रोजी आयोजित केलेली बैठकही झाली नाही. एसआरए प्रकल्प एखाद्या ठिकाणी राबविण्यासाठी तेथील नागरिकांचे संमतीपत्र आवश्यक असते. त्या संमतीपत्रासह एसआरए प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या कोणत्याही प्रक्रिया न पार पाडता आयुक्तांनी या प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते रिमोटद्वारे बटन दाबून शुभारंभ केला आहे. >काम काहीच नाही; पण उद्घाटनाचे मार्केटिंगस्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते २५ जून रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम पुण्यात घ्यायचा असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना केवळ ८ दिवस अगोदर कळविण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेच्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नव्हती. कोणत्याही कामाचे टेंडर काढण्यात आले नव्हते. त्यामुळे अवघ्या ८ दिवसांत उद्घाटन कोणत्या प्रकल्पांचे करायचे, असा प्रश्न आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर पडला. त्यामुळे बहुतांश अर्धवट प्रकल्पांचेच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेचे काम काहीच नाही; पण उद्घाटने करून त्याचे देशभर मार्केटिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.>प्रकल्पांची माहिती मागविलीपंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलेले बहुतांश प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्याने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी या सर्व प्रकल्पांच्या कागदपत्रांची माहिती मागविली आहे. या प्रकल्पांना मान्यता कधी घेतली, त्याचे टेंडर कधी काढले, काम सध्या कुठल्या टप्प्यात आहे, याची माहिती मागविली आहे.>औंध येथील बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील एसआरए प्रोजेक्ट हा एक चांगला प्रकल्प असेल. त्याचे नोटिफिकेशन एसआरएने प्रसिध्द केले आहे. या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे त्याबाबत करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत.- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त