शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’मध्ये अकोल्यातील ‘निसर्गकट्टा’च्या कार्याचा गौरव!

By admin | Updated: August 28, 2016 23:09 IST

पंतप्रधानांनी केले निसर्गकट्टा संस्थेकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन.

अकोला, दि. २८ : पर्यावरणाच्या रक्षणासाठी अकोल्यातील 'निसर्गकट्टा'सारख्या सामाजिक संस्थेकडून प्रेरणा घ्यावी आणि कार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात केली. यावेळी पंतप्रधानांनी संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोदगारही काढले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. रविवारी पंतप्रधानांनी मन की बातमधून जनतेला आगामी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करीत नागरिकांनी मातीच्या मूर्तींंना महत्त्व द्यावे, असे सांगत त्यांनी विदर्भातील अकोल्यातील एक पर्यावरणस्नेही निसर्गकट्टा ही संस्था पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटत आहे. गणेशोत्सवात शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी निसर्गकट्टा संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि या संस्थेकडून प्रेरणा घेऊन पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.पंतप्रधानांनी अकोल्यातील निसर्गकट्टा संस्थेच्या कार्याची घेतलेली दखल अकोल्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. पंतप्रधानांनी अकोल्यातील एखाद्या संस्थेच्या कार्याची दखल घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. अमोल सावंत, संदीप वाघाडकर यांनी २00५ मध्ये पर्यावरणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी निसर्गकट्टा सुरू केला. निसर्गकट्टा ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांंसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. निसर्गकट्टा संस्थेशी जिल्हय़ासोबतच शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी जुळलेले आहेत. निसर्गकट्टाच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांंसाठी कार्यशाळा घेण्यात येतात. यासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पक्ष्यांचे रक्षण, पक्ष्यांसाठी घरटी बनवून त्याचे वितरण करणे, प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती आदी उपक्रम सातत्याने निसर्गकट्टातर्फे घेण्यात येतात. निसर्गकट्टाच्या कार्यामुळे अकोलेकर नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दुर्गोत्सव साजरा करण्यासंदर्भात जागरूकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान कार्यालयातील सचिव निसर्गकट्टाशी परिचितपंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकर परदेशी हे अकोल्यात जिल्हाधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अकोल्यात नरनाळा महोत्सव, पर्यावरणपूरक अनेक उपक्रम घेतले. निसर्गकट्टा संस्थेचे कार्य त्यांनी जवळून पाहिले. डॉ. परदेशी यांच्या माध्यमातून निसर्गकट्टाच्या कार्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंंत पोहोचली आणि चक्क पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमादरम्यान निर्सगकट्टाच्या उपक्रमांचे कौतुक केले.