शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

अमरावतीत भाऊगर्दी, यवतमाळात प्रतिष्ठा पणाला लागली

By admin | Updated: August 14, 2014 01:18 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित

माणिकराव ठाकरेंची परीक्षा गणेश देशमुख - अमरावती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडाचे निशाण आतापासूनच फडकू लागले आहेत. माजी राष्ट्रपती पुत्राचा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आठपैकी काँग्रेसचे चार, अपक्ष तीन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. काँग्रेसची ताकद या जिल्ह्यात पूर्वीपासूनच जशी मोठी, भांडणेही तशीच टोकाची! या निवडणुकीतही हा मुद्दा आहेच. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अमरावती, मेळघाट, तिवसा आणि चांदूररेल्वे यापैकी अमरावतीत माजी राज्यमंत्री सुनील देशमुखांची एन्ट्री झाल्यास लढत चुरशीची होणार हे निश्चित़ बडनेऱ्यात घमासान होईल. राष्ट्रवादीतून निष्कासित करण्यात आलेल्या संजय व सुलभा खोडके यांच्या अस्तित्त्वाची लढाई या मतदारसंघात आहे. अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी दावेदारीसाठी आमनेसामने उभी ठाकली आहे. येथेही उष्ण वारे वाहतील. तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर आणि चांदूररेल्वेतून वीरेंद्र जगताप यांना तगडे प्रतिस्पर्धी विरोधी पक्षात दिसत नाहीत. नवेच्छुकांना हे दोन्ही मतदारसंघ म्हणूनच विशेषत्त्वाने खुणावत आहेत. दर्यापूरचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अभिजित अडसूळ यांच्या अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघातही तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी नाही. आदिवासीक्षेत्र असलेल्या मेळघाटात केवळराम काळे यांच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे चित्र आहे़ यवतमाळात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!राज्यभरातील काँग्रेसची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळचे. पूर्वीचा दारव्हा, आताचा दिग्रस हा त्यांचा मतदारसंघ. २००४ मध्ये माणिकरावांना पराभूत करून शिवसेनेचे संजय राठोड दारव्ह्यातून निवडून आले होते. दिग्रसचे विद्यमान आमदार संजय राठोडच आहेत़ २००९ सालची निवडणूक माणिकरावांनी लढविली नव्हती. पक्षावर घराणेशाहीचा आरोप होत असला तरीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांचे चिरंजीव राहुल यांचे पुनर्वसन करण्यासाठी दिग्रस किंवा यवतमाळ मतदारसंघ हवा आहे. या मतदार संघात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत नंदीनी नीलेश पारवेकर या निवडून आल्या होत्या. त्यांचा उमेदवारीचा पत्ता कापणे सोपे नाही. यवतमाळमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत; परंतु कार्यकारिणी नाही. ६० वर्षांत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेतील सत्ता गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. यवतमाळात एकूण सात मतदारसंघांपैकी पाच काँग्रेस, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आहे ती संख्या राखता आली तरी माणिकरावांनी कमविले, अशी एकूण स्थिती आहे. विरोधी पक्ष बळकट नाहीत. संजय राठोड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्ष वाढविण्याच्या भानगडीत आपण संपू नये याची दक्षता बाळगून त्यांनी पक्षकार्य केलेले आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक लाल दिवे याच जिल्ह्यात आहेत. शिवाजीराव मोघे आणि मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात आहेत. वसंत पुरके हे विधानसभेचे उपसभापती आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे खरे !