शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

आदिवासींचे बालमृत्यू टाळण्यासाठी गाभा समिती

By admin | Updated: September 28, 2015 02:37 IST

राज्यातील १६ आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू टाळण्यासाठी शासनाने २०१३ मध्येच गाभा समिती गठित केली आहे

सुहास सुपासे , यवतमाळ राज्यातील १६ आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू टाळण्यासाठी शासनाने २०१३ मध्येच गाभा समिती गठित केली आहे. या समितीला अधिक क्रियाशील बनविण्याच्या हेतूने यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करून समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही समिती नव्या जोमाने कामाला लागून राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. गाभा समिती ज्या १६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे, त्यामध्ये यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसह गोंदिया, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, रायगड, ठाणे, पालघर या आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. आदिवासी भागातील बालमृत्यूचा दर कमी करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत १४ आॅगस्ट २०१३ रोजी शासन निर्णयान्वये गाभा समिती गठित केली आहे. या गाभा समितीच्या पाचव्या बैठकीत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व गृह विभागाचे (गृह विशेष) सचिव यांचा गाभा समितीमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील बालमृत्यू व अन्य समस्यांशी फारसे संबंधित नसलेल्या शालेय शिक्षण विभाग, नगरविकास विभाग व उद्योग विभागाच्या सचिवांना समितीतून वगळण्याचा निर्णय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव राहतील तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास विभाग, रोजगार हमी योजना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग आदी विभागांचे सर्व प्रधान सचिव गाभा समितीचे सदस्य राहतील. सोबतच सदस्यांमध्ये राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण अभियान, मुंबईचे महासंचालक आणि या सोळाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचाही सदस्य म्हणून समावेश राहील. स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून नागपूर येथील पौर्णिमा उपाध्याय, गडचिरोली येथील ‘सर्च’ या संस्थेचा प्रतिनिधी, ‘नर्मदा बचावो आंदोलन’ नंदुरबार या संस्थेचा प्रतिनिधी, ठाणे येथील कष्टकरी स्वयंसेवी संस्था, नाशिक येथील वचन संस्थेचा प्रतिनिधी तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक राहतील. आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या भागात विविध कारणांमुळे आणि आजारांमुळे बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध संस्था आणि शासन आपापल्या परीने कार्य करीत असले, तरी हे प्रमाण अद्यापही पाहिजे तसे कमी न झाल्याने शासनाच्या आदिवासी विभागाने गाभा समितीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून पुनर्रचना केली आहे. येत्या काळात या समितीच्या कुशल कार्यतत्परतेमुळे आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होणार, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.