शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 16, 2014 04:24 IST

गेल्या १५ दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर आहेत. इतर प्रमुख नेते स्वत:च उमेदवार असल्याने त्यांना आपला मतदार संघ साभांळत इतर उमेदवारांसाठी प्रचार करावा लागला. पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी पूर्व विदर्भात तीन तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दोन सभा घेत निवडणुकीच्या आखाड्यात रंगत आणली. नागपुरातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस, काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत , सतीश चतुर्वेदी , अनिस अहमद , सुबोध मोहिते , राजेंद्र मुळक , अनिल देशमुख, रमेश बंग, चंद्रपूर जिल्'ातून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी राज्य मंत्री विजय वडेट्टीवार, संजय देवतळे तर गडचिरोलीतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मरावबाब आत्राम या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागपुरातील पश्चिम नागपूर मतदार संघात काँग्रेसचे विकास ठाकरे आणि भाजपचे सुधाकर देशमुख तुल्यबळ लढत झाली. उत्तर नागपुरात माजी मंत्री नितीन राऊत आणि भाजपचे डॉ मिलींद माने यांच्यात काट्याची टक्कर झाली. जिल्यातील काटोल मतदार संघात काका- पुतणे अनिल आणि आशिष देशमुख यांच्यातील सामना राज्यात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, या लढाईत आशिष देशमुख यांचे वडील आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटस्थ राजेन्द्र मुळक यांना अखेरपर्यंत नागपूर शहरात मतदार संघ मिळाला नाही. परिणामी त्यांनी जिल्'ातील कामठी मतदार संघातून निवडणूक लढविली. तेथेही त्यांना भाजपचे हेवीवेट उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टक्कर दिली. चंद्रपूर जिल्'ात काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनी तिकीट कापल्याने त्यांनी अवघ्या काही तासांतच भाजपात प्रवेश करीत वरोरा मतदार संघातून आपली उमेदवारी ससादर केली. येथे त्यांचा सामना त्यांची वहिणी आसावरी देवतळे यांच्याशी झाला. काँग्रेसने यंदा त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दीर- भावजयाच्या या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपा स्ष्ट बहुमताचा दावा करीत असली तरी पूर्व विदर्भात काँग्रेसची पकड अजूनही पक्की आहे. यंदा तर युतीत सोडचिठ्ठी आणि आघाडीत बिघाडी झाल्याने मतांचे विभाजन अटळ आहे. शिवाय बंडोबांमुळे राजकीय समीकरणेच बदलली. परिणामी या भागातून कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील हे १९ आॅक्टोबर रोजी कळणार.अमरावतीत माजी राष्ट्रपतीपुत्र काँग्रेसचे रावसाहेब शेखावतविरुद्ध भाजपचे सुनील देशमुख, बडनेऱ्यात शिवसेनेचे संजय बंड, काँग्रेसच्या सुलभा खोडके आणि अपक्ष रवी राणा, तिवस्यात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता दिघडे आणि शिवसेनेचे नाना वानखेडे असा तिहेरी सामना रंगला. अमरावतीतील मुस्लिम भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. वर्धा जिल्ह््यातील देवळी मतदारसंघात काँग्रेसचे रणजित कांबळे, माजी खासदार भाजपचे सुरेश वाघमारे आणि बसपाचे उमेश म्हैसकर असा सामना रंगला. आर्वीमध्ये काँग्रेसचे अमर काळेविरुद्ध भाजपचे दादाराव केचे अशी थेट लढत झाली. हिंगणघाटमध्ये भाजपचे समिर कुणावार, राष्ट्रवादीचे राजू तिमांडे आणि शिवसेनेचे अशोक शिंदे असा तिरंगी डाव रंगला. वर्धेत अंदाज न येणारी लढत झाली. राष्ट्रवादीचे सुरेश देशमुख, भाजपचे पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे आणि बसपाचे निरज गुजर हे रिंगणात होते. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे प्रचंड औत्सुक्याचा विषय ठरलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत, पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांपैकी बुलडाणा जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला, तर अकोला व वाशिम जिल्ह्यात संमिश्र स्वरुपाचा प्रतिसाद मिळाला. बुधवारी पार पडलेल्या मतदानाच्या प्रारंभिक आकडेवारीनुसार, पश्चिम वऱ्हाडातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी, बुधवारी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम वऱ्हाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अकोला, वाशिम व बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्ह्यांमधील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण २५१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला बुधवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाला. प्रारंभिक आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ५९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये सरासरी ६२.३३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये सरासरी ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. याआधीच्या, म्हणजे २००९ मधील विधानसभा निवडणुकीत, अकोला जिल्ह्यात सरासरी ५४.४१ टक्के, वाशिम जिल्ह्यात सरासरी ६१.१८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ६६.१६ टक्के मतदान झाले होते. मतदानास प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्ये मतदान संथ गतीने झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ६० पर्यंत तरी पोहचेल की नाही, अशी शंका वाटायला लागली होती; मात्र दुपारी तीन वाजतानंतर मतदानाने वेग घेतला. अखेरच्या तासात तर अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी सायंकाळी सहा वाजतापूर्वी मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश केलेल्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, मतदानाची वेळ संपल्यानंतरही बराच काळ मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी हाती येण्यासही बराच विलंब झाला. जीव नकोसा करणाऱ्या ‘आॅक्टोबर हिट’चा मतदानावर परिणाम होईल, अशी आशंका व्यक्त केली जात असताना, हुडहुड चक्रीवादळाच्या परिणामी, काही भागांमध्ये बुधवारी सकाळपासून, आकाश ढगाळलेले होते आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरीही लावली. त्यामुळे उकाडा कमी झाल्यानेही मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. प्रथमच मतदानाचा हक्क बजावित असलेल्या नवमतदारांमध्ये, विशेषत: युवतींमध्ये, बराच उत्साह दिसून आला. मुस्लिम व दलितबहुल वस्त्यांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त होते. त्याचप्रमाणे महिला वर्गातही दुपारनंतर उत्साह दिसला. चाकरमान्यांनी मात्र फारसा उत्साह दाखविला नाही. अकोला व वाशिम जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात मतदारांचा उत्साह जास्त जाणवला. पश्चिम वऱ्हाडात एकूण १६३ संवेदनशील, ३५ अतिसंवेदनशील व ११ उपद्रवी मतदान केंद्रे असली तरी, सुदैवाने काही किरकोळ वाद वगळता, कुठेही कोणत्याही प्रकारची मोठी अनुचित घटना घडली नाही. तीनही जिल्ह्यांमधील काही गावांमधील गावकऱ्यांनी, त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता; मात्र प्रत्यक्षात वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील जनुना आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा व बाभुळगाव ही गावे वगळता, उर्वरित सर्व गावातील गावकऱ्यांनी बहिष्काराचे अस्त्र म्यान केले. प्रशासनाने लाख प्रयत्न करूनही या तीन गावांमधील गावकरी मात्र बहिष्काराच्या निर्णयावर ठामच राहिले.