शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या मर्जीनुसारच संमेलनाध्यक्ष

By admin | Updated: November 3, 2016 03:36 IST

मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते.

ठाणे : मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते. अशा अध्यक्षांमुळे संमेलनाचा दर्जा खालावतो, असा आरोप कवी अशोक बागवे यांनी केला. डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जयप्रकाश घुमटकर यांच्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदासाठी रावसाहेब कसबे, म. सु. पाटील याच्यांसारखे ज्येष्ठ साहित्यिक रिंगणात असते तर मी अर्जच भरला नसता, असे सांगत एकही तुल्यबळ साहित्यिक रिंगणात नसल्यानेच मी निवडणुकीला उभा राहिलो, असे सांगत घुमटकर यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थन केले. हल्ली ज्वलंतपणे न लिहिता गुळमुळीत लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अशी टीकाही त्यांनी अन्य उमेदवार व साहित्यिकांचे नाव न घेता केली. न्यायमूर्ती रानडे यांनी जेव्हा ग्रंथकारांचे संमेलन घेतले, तेव्हा महात्मा फुले यांनी त्याचा उल्लेख ‘शेटजी भटजीं’चे संमेलन असा केला होता. ती परंपरा आजही कायम असून तिला शह देण्याची गरज आहे. घुमटकर यांच्यासारखे भूमिपुत्रच तो शह देऊ शकतात, असे वक्तव्यही बागवे यांनी केले. साहित्य महामंडळाच्या संचालकपदी सर्जनशील साहित्यिक असावे. परंतु महामंडळातील बरेचसे साहित्यिकच नाहीत. महामंडळात १३,७०० आजीव सभासद असूनही फक्त १,०७० सभासदांना मतदानाचा अधिकार असल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सभासद असूनही मला मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महामंडळाचा कारभार उघडा पाडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. संमेलनाध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रियाच मान्य नसल्याचे सांगत घुमटकर म्हणाले, माझ्यासमोर ज्येष्ठ-तुल्यबळ साहित्यिक नसल्यानेच मी यंदाच्या निवडणुकीत उभा राहिलो. अध्यक्षपदाच्या रिंगणात असूनही मतदारयादीत नाव नसल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा मांडला. महामंडळाचे कार्यालय पुण्याहून नागपूरला नेण्याच्या घडामोडींवरही त्यांनी टीका केली आणि यातून पुण्याची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. अध्यक्ष झाल्यावर काय करणार, याची माहिती देणारे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. (प्रतिनिधी)