शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या मर्जीनुसारच संमेलनाध्यक्ष

By admin | Updated: November 3, 2016 03:36 IST

मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते.

ठाणे : मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते. अशा अध्यक्षांमुळे संमेलनाचा दर्जा खालावतो, असा आरोप कवी अशोक बागवे यांनी केला. डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जयप्रकाश घुमटकर यांच्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदासाठी रावसाहेब कसबे, म. सु. पाटील याच्यांसारखे ज्येष्ठ साहित्यिक रिंगणात असते तर मी अर्जच भरला नसता, असे सांगत एकही तुल्यबळ साहित्यिक रिंगणात नसल्यानेच मी निवडणुकीला उभा राहिलो, असे सांगत घुमटकर यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थन केले. हल्ली ज्वलंतपणे न लिहिता गुळमुळीत लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अशी टीकाही त्यांनी अन्य उमेदवार व साहित्यिकांचे नाव न घेता केली. न्यायमूर्ती रानडे यांनी जेव्हा ग्रंथकारांचे संमेलन घेतले, तेव्हा महात्मा फुले यांनी त्याचा उल्लेख ‘शेटजी भटजीं’चे संमेलन असा केला होता. ती परंपरा आजही कायम असून तिला शह देण्याची गरज आहे. घुमटकर यांच्यासारखे भूमिपुत्रच तो शह देऊ शकतात, असे वक्तव्यही बागवे यांनी केले. साहित्य महामंडळाच्या संचालकपदी सर्जनशील साहित्यिक असावे. परंतु महामंडळातील बरेचसे साहित्यिकच नाहीत. महामंडळात १३,७०० आजीव सभासद असूनही फक्त १,०७० सभासदांना मतदानाचा अधिकार असल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सभासद असूनही मला मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महामंडळाचा कारभार उघडा पाडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. संमेलनाध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रियाच मान्य नसल्याचे सांगत घुमटकर म्हणाले, माझ्यासमोर ज्येष्ठ-तुल्यबळ साहित्यिक नसल्यानेच मी यंदाच्या निवडणुकीत उभा राहिलो. अध्यक्षपदाच्या रिंगणात असूनही मतदारयादीत नाव नसल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा मांडला. महामंडळाचे कार्यालय पुण्याहून नागपूरला नेण्याच्या घडामोडींवरही त्यांनी टीका केली आणि यातून पुण्याची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. अध्यक्ष झाल्यावर काय करणार, याची माहिती देणारे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. (प्रतिनिधी)