शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नेत्यांच्या मर्जीनुसारच संमेलनाध्यक्ष

By admin | Updated: November 3, 2016 03:36 IST

मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते.

ठाणे : मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते. अशा अध्यक्षांमुळे संमेलनाचा दर्जा खालावतो, असा आरोप कवी अशोक बागवे यांनी केला. डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जयप्रकाश घुमटकर यांच्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदासाठी रावसाहेब कसबे, म. सु. पाटील याच्यांसारखे ज्येष्ठ साहित्यिक रिंगणात असते तर मी अर्जच भरला नसता, असे सांगत एकही तुल्यबळ साहित्यिक रिंगणात नसल्यानेच मी निवडणुकीला उभा राहिलो, असे सांगत घुमटकर यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थन केले. हल्ली ज्वलंतपणे न लिहिता गुळमुळीत लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अशी टीकाही त्यांनी अन्य उमेदवार व साहित्यिकांचे नाव न घेता केली. न्यायमूर्ती रानडे यांनी जेव्हा ग्रंथकारांचे संमेलन घेतले, तेव्हा महात्मा फुले यांनी त्याचा उल्लेख ‘शेटजी भटजीं’चे संमेलन असा केला होता. ती परंपरा आजही कायम असून तिला शह देण्याची गरज आहे. घुमटकर यांच्यासारखे भूमिपुत्रच तो शह देऊ शकतात, असे वक्तव्यही बागवे यांनी केले. साहित्य महामंडळाच्या संचालकपदी सर्जनशील साहित्यिक असावे. परंतु महामंडळातील बरेचसे साहित्यिकच नाहीत. महामंडळात १३,७०० आजीव सभासद असूनही फक्त १,०७० सभासदांना मतदानाचा अधिकार असल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सभासद असूनही मला मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महामंडळाचा कारभार उघडा पाडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. संमेलनाध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रियाच मान्य नसल्याचे सांगत घुमटकर म्हणाले, माझ्यासमोर ज्येष्ठ-तुल्यबळ साहित्यिक नसल्यानेच मी यंदाच्या निवडणुकीत उभा राहिलो. अध्यक्षपदाच्या रिंगणात असूनही मतदारयादीत नाव नसल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा मांडला. महामंडळाचे कार्यालय पुण्याहून नागपूरला नेण्याच्या घडामोडींवरही त्यांनी टीका केली आणि यातून पुण्याची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. अध्यक्ष झाल्यावर काय करणार, याची माहिती देणारे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. (प्रतिनिधी)