शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
7
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
8
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
9
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
10
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
11
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
12
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
13
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
14
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
15
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
16
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
17
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
18
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
20
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

बीएसयूपीतील १४०० घरे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 04:03 IST

बीएसयूपी योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेची १४०० घरे बांधून तयार आहेत.

कल्याण : बीएसयूपी योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेची १४०० घरे बांधून तयार आहेत. त्यांचे वाटप लवकरात लवकर करावे, अशी मागणी बीएसयूपी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिका सचिवांकडे केली आहे. पण लाभार्थींची यादी तयार नसल्याने आणि पालिकेला घरे ताब्यात देण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने हे वाटप रखडले आहे. केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत पालिकेने १३ हजार घरे बांधण्याचा प्रकल्प २००९ मध्ये हाती घेतला होता. मात्र त्यात प्रचंड दिरंगाई झाल्याने या प्रकल्पातील घरांचे उद्दीष्ट कमी करण्यात आले. आता १३ हजारांऐवजी आठ हजार १८६ घरे बांधण्याचे उद्दीष्ट महापालिकेसमोर आहे. महापालिकेने या प्रकल्पांतर्गत डोंबिवलीतील आंबेडकरनगर आणि दत्तनगरात जवळपास ४०० घरांचे वाटप केले. पालिकेने आतापर्यंत केवळ १४०० घरे बांधून पूर्ण केली आहे. पण त्याचे वाटप झालेले नाही. ते व्हावे, म्हणून प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी सचिव सुभाष भुजबळ यांना पत्रही पाठवले आहे. पालिकेने लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ती तयार नसल्याने घरे वाटता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या १४०० घरे बांधून पूर्ण झाली असून ती वाटपाच्या प्रतिक्षेत आहे, तर आणखी ५०० घरे मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित घरे मार्च २०१७ अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.