शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

‘टोलमुक्ती’ची तयारी

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

महापालिका : ‘आयआरबी’स आणखी एक भूखंड देण्याबाबत चाचपणी

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करताना ‘आयआरबी’ कंपनीला द्याव्या लागणाऱ्या प्रकल्प खर्चाच्या रकमेची जबाबदारी राज्य सरकारने घेतली असली तरी ऐनवेळी एखादा भूखंड द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून आल्यास त्याची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने शहरातील पाच ते सहा जागांची पाहणी करून ठेवली आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत निर्णय अपेक्षित आहे. गेली तीन वर्षे कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसलेले टोलचे भूत १ डिसेंबरपूर्वी रद्द करून ‘आयआरबी’चा बोऱ्याबिस्तारा गुंडाळला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांना सांगितले आहे. त्यामुळे टोलमुक्तीची वेळ जवळ आल्याची खात्री शहरवासीयांना झाली आहे. ‘आयआरबी’ कंपनीला किती रक्कम शासन देणार व कधी टोलमुक्तीची घोषणा होणार, याकडेच शहरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या फेरमूल्यांकन समितीने २३९ कोटी ६२ लाखांचे रस्त्यांचे मूल्यांकन केले आहे; परंतु ‘आयआरबी’ने ते अमान्य केले असून, आतापर्यंतचे व्याज व प्रकल्प खर्च असे मिळून ४८३ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा केला आहे. व इतकीच रक्कम देण्यात यावी, याबाबत कंपनी ठाम आहे. त्यामुळे नेमकी किती रक्कम ‘आयआरबी’ला द्यायची, याबाबत मतभेद आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार आहेत. रस्ते विकास प्रकल्पाचे दोन्ही बाजूंनी मूल्यांकन मान्य झाल्यानंतर जी रक्कम निश्चित केली जाईल, ती राज्य सरकार देणार आहे. तरीही राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी महापालिकेकडे शहरात काही भूखंड शिल्लक आहेत का, याची चौकशी केली होती. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांच्या सूचनेप्रमाणे महापालिका अधिकाऱ्यांनी काही भूखंडांची पाहणी करून त्यांची यादी तयार केली आहे.पाच ते सहा भूखंडांपैकी एखादा भूखंड देता येईल, यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे.३०० कोटींपर्यंत तडजोडीची शक्यता राज्य सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले असून, कोल्हापूरला टोलमुक्त करायचे ठरविले आहे. विशेषत: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी ‘आयआरबी’शी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा आग्रह धरला असल्याचे समजते. अंदाजे २७५ ते ३०० कोटी रुपयांपर्यंत ‘आयआरबी’ची रक्कम निश्चित होऊ शकते. त्यातून टेंबलाईवाडी येथील जागेचे १०७ कोटी मूल्य वजावट करुन उर्वरित रक्कम राज्य सरकार महानगरपालिका प्रशासनास अनुदानाच्या स्वरूपात देईल, अशी चर्चा आहे. ‘त्या’ भूखंडाचे मूल्य १०७ कोटी महापालिका प्रशासनाने ‘आयआरबी’ला दिलेल्या टेंबलाईवाडी येथील तीन लाख चौरस फुटांच्या भूखंडाचे मूल्यांकन १०७ कोटी ५७ लाख २५ हजार इतके झाले आहे. नगररचना सहायक संचालक धनंजय खोत यांनी या मूल्यांकनाची जबाबदारी कोल्हापुरातीलच डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेकडे दिली होती. या संस्थेला राज्य सरकारची मान्यता आहे. त्यामुळे ‘आयआरबी’ला द्यावयाच्या रकमेतून ही १०७ कोटी ५७ लाखांची रक्कम वळती करावी लागणार आहे.