शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी सर्व जागांवर लढण्याचीही तयारी

By admin | Updated: September 22, 2014 08:37 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, २८८ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचीही आमची तयारी आहे

औरंगाबाद : काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, २८८ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचीही आमची तयारी आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला. अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बसणार नाही, असे वक्तव्य अशा वेळी करायला नको होते; पण आता ते त्यांच्याबरोबरच बसतात ना, असा चिमटाही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काढला . तत्पूर्वी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना राणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक ‘आम्ही जिंकणारच’ या जिद्दीने कामाला लागा, असा सल्ला दिला. राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव कसला मुख्यमंत्री होतोय. पक्षासाठी चार तास देणारा, चार चार तास वाट बघूनही भेट न मिळू शकणारा असा हा नेता आहे. त्याला कापूस, सोयाबीन कशाला म्हणतात, काही कळत नाही. तो मला मुख्यमंत्री व्हायचंय हे बाईच्या आवाजात बोलत होता की, पुरुषाच्या कळलं नाही. अरे जोरात म्हण ना, मला मुख्यमंत्री व्हायचंय; पण कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. शिवसेनेत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कसलाच मान-सन्मान नाही, ह सांगताना राणे यांनी काही उदाहरणे दिली. अच्छे दिन आनेवाले है असा नारा देऊन नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. दिलेली आश्वासने पाळण्याची चुणूकसुद्धा त्यांनी दाखविलेली नाही. त्यांची लाट ओसरली हे अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून लक्षात आले आहे. लाट येते आणि ओसरतेही. मोदी सरकार मूठभर धनदांडग्यांना लाभदायक असल्याचा आरोप राणे यांनी केला. राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच बैठक होती. या बैठकीला मराठवाडाभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा. रजनी पाटील व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही मार्गदर्शन केले.पक्ष सांगेल तेच : चव्हाणनेते स्वत:च उमेदवाऱ्या जाहीर करीत आहेत. कार्यकर्त्यांचे मरण होत आहे, याकडे एका पत्रकाराने लक्ष वेधताच अशोक चव्हाण म्हणाले, काल भोकरची जागा अमिता चव्हाण यांच्यासाठी जाहीर झाली. असे मुळीच घडलेले नाही. तसेच नांदेड लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे भास्कर पाटील खतगावकर यांनी आधीच जाहीर केले होते. पूर्वी मुस्लिम लीग होती. त्याप्रमाणेच एमआयएमचा फारसा प्रभाव राहणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.