शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

प्रसंगी सर्व जागांवर लढण्याचीही तयारी

By admin | Updated: September 22, 2014 08:37 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, २८८ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचीही आमची तयारी आहे

औरंगाबाद : काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, २८८ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचीही आमची तयारी आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला. अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बसणार नाही, असे वक्तव्य अशा वेळी करायला नको होते; पण आता ते त्यांच्याबरोबरच बसतात ना, असा चिमटाही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काढला . तत्पूर्वी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना राणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक ‘आम्ही जिंकणारच’ या जिद्दीने कामाला लागा, असा सल्ला दिला. राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव कसला मुख्यमंत्री होतोय. पक्षासाठी चार तास देणारा, चार चार तास वाट बघूनही भेट न मिळू शकणारा असा हा नेता आहे. त्याला कापूस, सोयाबीन कशाला म्हणतात, काही कळत नाही. तो मला मुख्यमंत्री व्हायचंय हे बाईच्या आवाजात बोलत होता की, पुरुषाच्या कळलं नाही. अरे जोरात म्हण ना, मला मुख्यमंत्री व्हायचंय; पण कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. शिवसेनेत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कसलाच मान-सन्मान नाही, ह सांगताना राणे यांनी काही उदाहरणे दिली. अच्छे दिन आनेवाले है असा नारा देऊन नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. दिलेली आश्वासने पाळण्याची चुणूकसुद्धा त्यांनी दाखविलेली नाही. त्यांची लाट ओसरली हे अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून लक्षात आले आहे. लाट येते आणि ओसरतेही. मोदी सरकार मूठभर धनदांडग्यांना लाभदायक असल्याचा आरोप राणे यांनी केला. राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच बैठक होती. या बैठकीला मराठवाडाभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा. रजनी पाटील व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही मार्गदर्शन केले.पक्ष सांगेल तेच : चव्हाणनेते स्वत:च उमेदवाऱ्या जाहीर करीत आहेत. कार्यकर्त्यांचे मरण होत आहे, याकडे एका पत्रकाराने लक्ष वेधताच अशोक चव्हाण म्हणाले, काल भोकरची जागा अमिता चव्हाण यांच्यासाठी जाहीर झाली. असे मुळीच घडलेले नाही. तसेच नांदेड लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे भास्कर पाटील खतगावकर यांनी आधीच जाहीर केले होते. पूर्वी मुस्लिम लीग होती. त्याप्रमाणेच एमआयएमचा फारसा प्रभाव राहणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.