शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

आगारांचा होणार कायापालट

By admin | Updated: February 14, 2015 04:15 IST

बकालपणा आलेल्या एसटी आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस

मुंबई : बकालपणा आलेल्या एसटी आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्वच्छता अभियानात एसटी कर्मचाऱ्यांचा सहभाग निश्चित असून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. राज्यात एसटीचे २५0 आगार आहेत. या आगारात मात्र प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. ठिकठिकाणी असलेला कचरा, पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय, कँटीनमध्ये खाद्यपदार्थांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आणि त्यांच्या सुविधा नकोशा होतात. त्याचप्रमाणे एसटीला नवीन आगारांची संकल्पना राबविणे सध्या तरी शक्य नाही. या सर्व कारणांमुळे एसटी आगारांमध्ये १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. या अभियानातंर्गत आगार आणि बसस्थानकांत सफाई, प्रसाधनगृहांची स्वच्छता, कचराकुंड्या बसविणे, झाडे लावणे इत्यादी उपक्रम राबविले जातील. ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे रावते म्हणाले. या कामासाठी मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांकडून मदत केली जाणार आहे. तसेच शिवसेनेतर्फे सर्व जिल्हाप्रमुखानांही या अभियानात सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)