शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

वीज निर्मितीला कोळशाचे ग्रहण

By admin | Updated: November 25, 2014 00:50 IST

चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात

चंद्रपूर कोळशाचा जिल्हा : मात्र वीज केंद्रालाच कोळसा मिळेना ! रवी जवळे -चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा राहायचा. मात्र अलिकडे या साठ्याला कोळसा खाणीचे ग्रहण लागले आहे. आजमितीस वीज केंद्रात दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याशिवाय रोज गरजेच्या तुलनेत पाच ते दहा हजार मेट्रीक टन कोळसा कमी पुरविला जात असल्याने वीज निर्मिती प्रभावित होत आहे.जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्याने कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. त्यामुळे चंद्रपूरजवळ ऊर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले. दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र आहे. कोळशाच्या जिल्ह्यात हे वीज केंद्र असल्याने पावसाळा वगळता या केंद्रातील वीज निर्मिती कमी होणे अपेक्षित नाही. मात्र दुर्दैवाने या केंद्रातून क्षमतेएवढी वीज निर्मिती अपवादात्मक स्थितीतच होते. या केंद्रात चार संच २१० मेगावॅट तर तीन संच ५०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले आहेत. २१० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज चार हजार मेट्रिक टन कोळसा लागतो तर ५०० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज १२ हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. कोळशाचा दर्जा सुमार असला तर दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीसाठी ढोबळमानाने सुमारे ४५ ते ५० हजार मेट्रिक टन कोळशाची गरज पडते. काही वेळा तर याहून कमी कोळसा येतो. यामुळे वीज निर्मिती तर प्रभावित होते आहेच. शिवाय कोळशाचा स्टॉकही रिकामा होत आहे. पूर्वी सात दिवस पुरेल इतका साठा ‘इमर्जंसी’ म्हणून ठेवला जायचा. अलिकडे एवढा साठा कधीच राहत नाही. सध्या वीज केंद्रात दीड दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. रोज मागणीच्या तुलनेत कोळसा कमी येत असल्याने वीज निर्मितीवर आणि पर्यायाने राज्यातील वीज उपलब्धतेवर परिणाम होत आहे.