शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

वीज निर्मितीला कोळशाचे ग्रहण

By admin | Updated: November 25, 2014 00:50 IST

चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात

चंद्रपूर कोळशाचा जिल्हा : मात्र वीज केंद्रालाच कोळसा मिळेना ! रवी जवळे -चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा राहायचा. मात्र अलिकडे या साठ्याला कोळसा खाणीचे ग्रहण लागले आहे. आजमितीस वीज केंद्रात दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याशिवाय रोज गरजेच्या तुलनेत पाच ते दहा हजार मेट्रीक टन कोळसा कमी पुरविला जात असल्याने वीज निर्मिती प्रभावित होत आहे.जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्याने कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. त्यामुळे चंद्रपूरजवळ ऊर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले. दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र आहे. कोळशाच्या जिल्ह्यात हे वीज केंद्र असल्याने पावसाळा वगळता या केंद्रातील वीज निर्मिती कमी होणे अपेक्षित नाही. मात्र दुर्दैवाने या केंद्रातून क्षमतेएवढी वीज निर्मिती अपवादात्मक स्थितीतच होते. या केंद्रात चार संच २१० मेगावॅट तर तीन संच ५०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले आहेत. २१० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज चार हजार मेट्रिक टन कोळसा लागतो तर ५०० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज १२ हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. कोळशाचा दर्जा सुमार असला तर दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीसाठी ढोबळमानाने सुमारे ४५ ते ५० हजार मेट्रिक टन कोळशाची गरज पडते. काही वेळा तर याहून कमी कोळसा येतो. यामुळे वीज निर्मिती तर प्रभावित होते आहेच. शिवाय कोळशाचा स्टॉकही रिकामा होत आहे. पूर्वी सात दिवस पुरेल इतका साठा ‘इमर्जंसी’ म्हणून ठेवला जायचा. अलिकडे एवढा साठा कधीच राहत नाही. सध्या वीज केंद्रात दीड दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. रोज मागणीच्या तुलनेत कोळसा कमी येत असल्याने वीज निर्मितीवर आणि पर्यायाने राज्यातील वीज उपलब्धतेवर परिणाम होत आहे.